शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

शहराकडे जाण्याचे प्रमाण घटल्यास आत्महत्यांना पायबंद

By admin | Published: October 16, 2015 1:21 AM

शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो

पुणे : शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो आणि हतबल होतो. या तरुणांचे शहराकडे जाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आत्महत्यांचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. लायन्स क्लबतर्फे शताब्दीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी परिवारांना मदतीचा हात देण्यासाठी नाना पाटेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला. या वेळी पाटेकर बोलत होते. याप्रसंगी लायन्स क्लबचे श्रीकांत सोनी, शैैलेश शहा, सतीश देसाई, श्याम अगरवाल, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे आदी उपस्थित होते.पाटेकर म्हणाले, की मन हेलावून टाकणारी घटना घडली की भावनेचा उद्रेक होतो आणि भूमिका बदलते. औैरंगाबादमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पाहिल्या आणि मन हेलावले. त्यातूनच या चळवळीची सुरुवात झाली.राजकीय घडामोडींवर, राजकारण्यांच्या नाकर्तेपणावर भाष्य करण्यापेक्षा मदतीचा हात पुढे करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. मदतीतून शेतकऱ्यांना अपंग न करता त्यांना केवळ पाठिंब्याची जाणीव आपण करून द्यायची आहे. शेतकऱ्यांना मदत केली की आपले काम संपत नाही, तर प्रक्रिया सुरू होते. या पाठिंब्याची चळवळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हायला हवी. बळीराजाच्या जमिनीत राहून श्रमदान करायला हवे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले.आयुष्यभर संपत्तीचा संचय करण्यापेक्षा तो गरजूंसाठी खर्च करायला शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा ६७ वर्षांत ते जो बदल घडवून आणू शकले नाहीत, तो आपण सर्व जण मिळून १०-१५ वर्षांमध्ये घडवून आणू शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)