शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकले, तर देशात लाेकशाही टिकेल, न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:14 IST

Justice Abhay Oak: राज्यघटनेने निर्माण केलेल्या न्यायव्यवस्थेचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि न्यायालयातून चांगल्या प्रतीचा न्याय लवकर मिळणे गरजेचे आहे. न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकले, तर देशातील लाेकशाही टिकेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.

पुणे - राज्यघटनेने निर्माण केलेल्या न्यायव्यवस्थेचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि न्यायालयातून चांगल्या प्रतीचा न्याय लवकर मिळणे गरजेचे आहे. न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकले, तर देशातील लाेकशाही टिकेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने आयाेजित ‘राज्यस्तरीय वकील परिषद २०२४’ चे उद्घाटन न्यायमूर्ती ओक यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे, उद्योगमंत्री उदय सामंत, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार, के. आर. श्रीराम आणि रेवती मोहिते-डेरे, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण आदी उपस्थित हाेते. 

राज्यात स्वतंत्र कायदा विद्यापीठाची गरज न्या. ओक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांत स्वतंत्र विद्यापीठ आहेत. त्याच धर्तीवर कर्नाटकातही कायदा विद्यापीठ स्थापन झाले आहे. राज्यात कायदा विद्यापीठ स्थापन झाल्यास केवळ काॅलेजला संलग्नता देणे तसेच राज्यभर समान अभ्यासक्रम लागू करणे शक्य हाेईल आणि त्यातून दर्जेदार कायदाविषयक शिक्षण देता येईल.

‘न्यायालय अवमानप्रकरणी कारवाई व्हावी’ सर्वाेच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राजकारणी जाहीर पत्रकार परिषद घेऊन वक्तव्य करतात, ही शाेकांतिका आहे. न्यायिक व्यवस्थेचा आदर ठेवला पाहिजे; न्यायालयाच्या निर्णयांवर शंका अथवा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असे उद्योगमंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालयdemocracyलोकशाही