शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
2
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
3
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
4
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
5
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
6
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
7
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
8
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
9
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
10
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
11
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
12
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
13
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
14
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
15
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
17
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
18
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
19
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
20
IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते...

Pune: कार्यकर्त्याला हात लागला तर तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:25 IST

मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रभाकर बांगर यांची घेतली भेट...

मंचर (पुणे) : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना मारहाण झाल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. येथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागला तर याद राखा, तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना एकलहरे येथे मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून राजू शेट्टी यांनी सकाळी येथे येऊन बांगर यांची भेट घेत विचारपूस केली. बांगर यांनी मारहाणीचा सर्व प्रकार कथन केला. त्यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटनेचे कार्यकर्ते नेहमीच आंदोलन करतात. त्यांच्यावर हल्ला अथवा मारहाण होणे हा प्रकार आम्हाला नवीन नाही. मात्र बांगर यांच्या मारहाण प्रकरणातील आरोपीवर कसाबसा गुन्हा दाखल झाला आहे. हे आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. पोलिस ठाण्यात महात्मा गांधी जयंतीला आरोपी हजर होते. मात्र तरीही पोलिसांच्या हाती ते लागत नाही. काही आरोपी हॉस्पिटल परिसरात फिरून दहशत निर्माण करू पाहत होते. आमच्या विरुद्ध आंदोलन कराल तर याद राखा, असा संदेश ते देऊ पाहत होते. याद्वारे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. प्रभाकर बांगर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन बाहेर आणतो. दम असेल तर पुन्हा हल्ला करा, जशास तसे उत्तर देऊ, असे ठणकावले. यावेळी प्रकाश बालवडकर, बापूसाहेब करंडे, अमरसिंह कदम, मारुती गोरडे, काशिनाथ दौंडकर तसेच उदय पाटील, सचिन बांगर, राजू बेंडे-पाटील, गणेश खानदेशे, वनाजी बांगर आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा

इथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागला तर याद राखा तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही. बांगर यांच्या वडिलांना धक्का बसल्याने त्यांनी विष प्राशन केले आहे. त्यांचे काही बरे वाईट झाले तर वेगळा गुन्हा दाखल होईल. यातील आरोपींबरोबरच सूत्रधारांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ही राजू शेट्टी यांनी केली. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार असल्याचे सांगून सत्तेचा माज मस्ती आल्याने तसेच वर्षानुवर्ष तीच लोक पुन्हा पुन्हा निवडून दिल्याने हा माज आला आहे. सर्वसामान्य लोक याचा विचार करतील, असे राजू शेट्टी म्हणाले.

एफआरपी अधिक चारशे रुपये सोडणार नाही. मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी दहशत माजवण्याचा उद्योग कोणी करत असेल तर रक्त सांडू, डोके फोडून घेऊ पण तुमच्या घशातून चारशे रुपये काढूच, हा कारखानदारांना इशारा आहे. या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू असून मागणी मान्य न झाल्यास साखर कोंडी करून यावर्षीचा सिझन सुरू होऊ देणार नाही.

- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणे