शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

देशाला तीन सरन्यायाधीश, राज्याला तीन मुख्यमंत्री देणारे पुण्यातील ILS LAW काॅलेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 15:55 IST

आयएलएसचे पी. बी. गजेंद्रगडकर, वाय. व्ही. चंद्रचूड, ई. एस. वेंकटरामय्या हे माजी विद्यार्थी सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले

प्रशांत बिडवे 

पुणे : देशाला तीन सरन्यायाधीश, महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश आणि असंख्य विधिज्ज्ञ घडविणारे शहरातील इंडियन लाॅ साेसायटी म्हणजेच ‘आयएलएस’ लाॅ कॉलेज शताब्दी वर्षांत प्रवेश करत आहे. या काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी विधीसह देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे. आयएलएस काॅलेज २० जूनला शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. या महाविद्यालयाला २० जून २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

आयएलएस लाॅ काॅलेजची स्थापना २० जून १९२४ राेजी झाली होती. मागील ९९ वर्षांत काॅलेजने विधी शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण केला आहे. काॅलेजने असंख्य अभ्यासू वकील, न्यायाधीश घडविले आहेत. तसेच शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी भारतीय राजकारणात कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. काॅलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर विधी क्षेत्रात सर्वाेच्च कामगिरी करीत जस्टीस पी. बी. गजेंद्रगडकर (१९६४-६६), जस्टीस वाय. व्ही. चंद्रचूड (१९७७-८५) आणि जस्टीस ई. एस. वेंकटरामय्या (१९८९) हे तीन माजी विद्यार्थी सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले.

काॅलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी राजकीय क्षेत्रातही देदीप्यमान कामगिरी केली. यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या उपपंतप्रधानपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाेते. यासाेबतच सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख दाेघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्रिपदीही विराजमान झाले हाेते. गाेपीनाथराव मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री म्हणून काम केले आहे.

सर्वाेच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची कारकीर्द :- 

- पी. बी. गजेंद्रगडकर यांची १९५७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि १९६४ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली. महागाई भत्ता आयोग, जम्मू आणि काश्मीर चौकशी आयोग, राष्ट्रीय श्रम आयोग तसेच बनारस हिंदू विद्यापीठ चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.

- वाय. व्ही. चंद्रचूड सर्वाधिक ७ वर्षे ४ महिने सरन्यायाधीश म्हणून कार्यरत हाेते. त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन काॅलेजमधून पदवी घेतल्यानंतर १९४२ साली आयएलएस काॅलेजमधून कायद्याची पदवी मिळविली. मुंबई उच्च न्यायालयात १९६१ साली न्यायाधीश झाले. सर्वाेच्च न्यायालयात १९७२ मध्ये न्यायाधीश तर १९७७ मध्ये भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजकीय दबावाला झुगारून देत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले.

- ई. एस. वेंकटरामय्या हे १९८९ मध्ये सरन्यायाधीश झाले. विधी क्षेत्रातील कारकिर्दीस १९४६ मध्ये सुरुवात केली. नाेव्हेंबर १९७० साली कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. सर्वाेच्च न्यायालयात १९७९ मध्ये न्यायाधीश आणि त्यानंतर १९८९ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्त झाले. ते कर्नाटकचे पहिले सरन्यायाधीश म्हणून ओळखले जातात.

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयadvocateवकिलSocialसामाजिकEducationशिक्षण