शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

महाराष्ट्रातल्या राजकारणात रस नाही :सुनील देवधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 17:09 IST

त्रिपुरात भाजपची सत्ता आल्यावर त्याचे श्रेय प्रभारी सुनील देवधर यांना देण्यात आले. निवडणुकीपूर्वी त्रिपुरात नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती स्वतः देवधर यांनी दिली. मात्र आपल्याला पक्ष देईल ती जबाबदारी निभवायची असून महाराष्ट्राच्या राजकारणात रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

ठळक मुद्देत्रिपुरा भाजपमध्ये पुढचे सहा महिने प्रवेश नाही सध्या पुतळ्यांची नाही माणसांची चिंता करण्याची गरज

पुणे : मला महाराष्ट्रातल्या राजकारणात रस नाही असे वक्तव्य भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर यांनी व्यक्त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की,मुंबईत सुरू असलेल्या शेतकरी मोर्च्याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी मी फक्त त्रिपुरात बोलायला योग्य आहे.फडणवीस कार्यकुशल मुख्यमंत्री आहे. या संकटाचा मुख्यमंत्री आणि पक्ष म्हणून भाजप योग्य सामना करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्रिपुरात भाजपची सत्ता आली असली तरी पुढील सहा महिने पक्ष प्रवेश बंद असणार असल्याचे धोरण त्यांनी स्पष्ट केले.   

लेनिन पुतळ्याच्या संदर्भात घडलेल्या घटनेवर बोलताना त्यांनी आम्ही त्या घटनेशी अजिबात सहमत नाही.. एखादा मूर्खपणा करतो त्याचे अनुकरण करत अजून चार जण करत असतील तरीही तो मुर्खपणाचं असतो. सध्या पुतळ्यांची चिंता कमी करून जिवंत माणसांची करायची गरज आहे असेही ते मतही त्यांनी मांडले.पुढे ते म्हणाले की, देशातील एकमेव त्रिपुरा राज्यात कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कम्युनिस्टमुक्त भारतची जबाबदारी  दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्रिपुरात कम्युनिस्ट पक्षाने कधीही प्रामाणिकपणे जिंकलेली नाहीये. त्यांचा पाया अपराध, बेईमानी आहे त्यामुळे त्यांच्याकडून  प्रामाणिक कामाची अपेक्षा चुकीची आहे. यंदाची शंभर टक्के निवडणूक कॅमेऱ्याच्या नियंत्रणात झाली. त्यामुळे ईच्छा असूनही त्यांना काहीही करता आले नाही. 25 वर्ष कम्युनिस्ट सरकार असूनही त्रिपुरात आजही 67 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली जगत आहेत.भारतात महिलांवर सर्वाधिक अत्याचार त्रिपुरात आहे. गुन्हे वेगवान आणि तपास संथ परिस्थिती आहे बलात्कार हा तिथे राजकीय सूड घेण्याचा प्रकार आहे. हा प्रकार फक्त कम्युनिस्ट सरकारच्या काळात होत होता असा आरोपही त्यांनी केला . माणिकसरकार ते फक्त निरुपयोगी मुख्यमंत्री होते. त्यांच्या खिशात 1300 रुपये, खात्यात 2300 रुपये मात्र 40 किलोमीटरसाठी खासगी हेलिकॉप्टर कसे वापरायचे असा सवालही त्यांनी विचारला.

टॅग्स :PuneपुणेTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018BJPभाजपा