शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

फाळणीचा 'तो' इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे ऐक्यासाठी याेग्य नाही - शरद पवार

By प्रशांत बिडवे | Updated: August 20, 2023 16:24 IST

देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे

पुणे: देशाची फाळणी झाल्यानंतर सामाजिक स्थितीबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे सीबीएसईने शाळांना पाठविलेल्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र, फाळणीचा रक्तपाताचा इतिहास आणि कटूतेची भावना असलेला इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे हे देशाच्या सामाजिक, सांघिक ऐक्यासाठी याेग्य राहणार नाही असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यातील शैक्षणिक संस्थेत असे काम करावे असे सीबीएसई सांगत असेल तर समाजात विसंवाद वाढेल असे काम हाेणार नाही याची शिक्षण विभागाने काळजी घेत त्यांना कळवावे असा सल्लाही त्यांनी शिक्षण मंत्र्यांना दिला.

सरहद संस्थेच्या सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथील नूतन इमारत आणि गाेपालकृष्ण गाेखले प्रबाेधिनीचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संजय नहार, शैलेश पगारिया, संतसिंह माेखा आदी मान्यवर उपस्थित हाेते.

पवार म्हणाले, सीबीएसई शाळा आणि अभ्यासक्रमावर नियंत्रण ठेवणाऱ्या बाेर्डाने सर्व शाळांना पाठविलेले एक परिपत्रक माझ्या वाचनात आले. हे परिपत्रक मला चिंताजनक वाटते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही अनेक गाेष्टी संबंधीचे मार्गदर्शन करता तसे या देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे. मात्र, फाळणीचा इतिहास देश विभाजनाचा इतिहास आहे. त्यावेळी रक्तपात झाला, हजाराे लाेक विस्थापित झाले. पाकिस्तानातून निघून आलेला सिंधी समाज माेठ्या संख्येने उल्हासनगर येथे राहताे. त्यांनीही त्यावेळी प्रचंड यातना सहन केल्या. पंजाब आणि त्या परिसरातील अनेक मुस्लिम लाेक पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात काय झालं? या बाबत मी काही बाेलू इच्छित असल्याचे त्यांनी नमूद केले.

नव्या पिढीची वैचारिक जडण घडण महत्वाची

सार्वजनिक जीवनात नव्या पिढीने यावे असा आग्रह आम्ही करताे. मात्र, ही पिढी वैचारिकदृष्ट्या घडलेली असली पाहिजे. देशाचा इतिहास आणि समाजाचे प्रश्न माहिती असले पाहिजेत. समाजातील सर्व घटकांना एकत्रित ठेवण्याची सक्ती त्यांच्यावर निर्माण केली पाहिजे आणि ते काम गाेखले प्रबाेधिनीच्या माध्यमातून हाेईल असे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणEducationशिक्षणCBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थी