शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

पुणे जिल्ह्यात पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी घेतले क्रेडिट कार्ड; तुम्हीही घ्या लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:18 AM

पीएम किसान सन्मान योजनेचे जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार लाभार्थी...

पुणे : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ६५ हजार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. या कार्डाचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. गेल्या वर्षी ४.१० लाख कार्डांचे वाटप केले होते. यंदाही हा आकडा तेवढाच असेल, अशी माहिती अग्रणी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रीकांत कोरगावकर यांनी दिली. हे कार्ड बँकेच्या बचत खात्यासारखे असून, शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याचा वापर करता येतो. वेळेत परतफेड केल्यास व्याजाचा १०० टक्के परतावा मिळतो, असेही त्यांनी सांगितले.

- पीएम किसान सन्मान योजनेचे जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार लाभार्थी आहेत.

- जिल्ह्यात २.६५ हजार शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड

आकडा आणखी वाढेल

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंत २.६५ हजार शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळाले आहे. हे कार्ड एका वर्षासाठी दिले जाते. याची प्रक्रिया वर्षभर सुरू असल्याने वर्ष सरल्यानंतर पुन्हा त्याचे नुतनीकरण केले जाते. त्यामुळे या आर्थिक वर्षाखेर हा आकडा आणखी वाढेल, अशी माहिती कारेगावकर यांनी दिली.

क्रेडिट कार्डचा लाभ काय?

तुम्ही क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुमच्याकडील जमीन, तिचा प्रकार, घेतली जाणारी पिके याचा तपशील बँकेला द्यावा लागतो. त्यानुसार तुमची क्रेडिट कार्डाची मर्यादा निश्चित केली जाते. ही रक्कम तुम्हाला अन्य क्रेडिट कार्डांसारखी वापरता येते. त्याचा उपयोग खते, बी-बियाणे, कीटकनाशके, औजारे खरेदीसाठी करता येतो. आपत्कालीन परीस्थितीत त्यातून रोख पैसेही काढता येतात. मात्र, या रकमेचा भरणा एक वर्षाच्या आत करावा लागतो. हा भरणा ३६४ दिवसांच्या आत अर्थात वर्षाच्या एक दिवस आधी केल्यास संबंधित शेतकरी व्याज परताव्याला पात्र ठरतो, असेही कारेगावकर यांनी सांगितले.

बँकेकडे करा अर्ज

कोणताही शेतकरी या कार्डासाठी अर्ज करू शकतो.

काय कागदपत्रे लागतील?

क्रेडिट कार्डासाठी ७-१२ उतारा, ८ अ उतारा तसेच पहिल्यांदा कार्ड घेत असल्यास फेरफार नकला ही कागदपत्रे आवश्यक असतात. नूतनीकरणावेळी फेरफार नकलांची आवश्यकता नसते. तसेच केवायसीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओखळपत्र द्यावे लागते.

गेल्या तीन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. खासगी सावकार व पतसंस्थेकडून त्यांनी कर्ज घेतले होते. ही वेळ येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सरकारी बँकाच्या क्रेडिट कार्डाचा लाभ घ्यावा. हे बचत खात्यासारखे आहे. गरजेच्या वेळी या पैशांचा वापर करता येतो. एका वर्षाचा आत कर्ज फेडल्यास १०० टक्के व्याज परतावा मिळतो.

- श्रीकांत कारेगावकर, वरिष्ठ व्यवस्थापक, अग्रणी बँक, महाराष्ट्र बँक

टॅग्स :PuneपुणेPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी