शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

औंधमधील 'त्या' घटनेनंतर नागरिक भयभीत, पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले अन् दिले 'हे' आश्वासन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 10:52 IST

अल्पवयीन आरोपींना सज्ञान ठरवून खटला चालवण्यासाठी, त्यांना जामीन मिळू नये यासाठी योग्य ती पाऊले उचलली जाणार - अमितेश कुमार

किरण शिंदे

पुणे: १३ जूनची पहाट.. ७७ वर्षाचे समीर रॉय चौधरी पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते परत घरी आलेच नाही.. औंधच्या परिहार चौकात दारुड्या टोळक्याने त्यांना अडवलं. दारू विकत घेण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र पैसे न दिल्याने त्यांना मारहाण केली. एकाने तर त्यांच्या डोक्यातच लोखंडी रॉडने वार केले. गंभीर जखमी झालेले समीर रॉय चौधरी कोमात गेले आणि उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.. शांत आणि संयमी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिक पोलीस प्रशासना विरोधात आक्रमक झाले. औंध परिसरात कॅन्डल मार्च काढून नागरिकांनी समीर रॉय चौधरी यांना श्रद्धांजली वाहिली. या कॅन्डल मार्चमध्ये पोलीस यंत्रणा झोपली आहे का, आम्हाला सुरक्षेची हमी द्या असे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पहाटेच्या सुमारास मारहाण करून चोरीच्या घटना या नेहमीच घडत असतात.. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करतात असा आरोपही या नागरिकांनी केला.. नागरिकांचा वाढता रोष पाहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः औंध येथील रस्त्यावर उतरले.. ज्या ठिकाणी समीर रॉय चौधरी यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी भेट देत एक किलोमीटर परिसराची पायी चालत पाहणी केली. आणि त्यानंतर औंधमधील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. 

नागरिकांशी संवाद साधताना अमितेश कुमार म्हणाले, या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी जे शक्य असेल ते सर्व करू. अल्पवयीन आरोपींना सज्ञान ठरवून खटला चालवण्यासाठी, त्यांना जामीन मिळू नये यासाठी किंवा त्यांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात योग्य ती पाऊले उचलली जातील. विशेष सरकारी वकिलामार्फत फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवून आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात सर्व प्रयत्न आम्ही प्रयत्नशील आहोत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास चांगल्या प्रकारे करून चौधरी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी आणि औंध परिसरातील शिस्त पुन्हा पूर्वीसारखी ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

दरम्यान समीर रॉय चौधरी यांचा खून करणाऱ्या आरोपींपैकी चार जण हे अल्पवयीन आहेत. यातील दोन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच बाल न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली होती. त्यादिवशी या आरोपींनी रात्रभर दारूची पार्टी केली होती. दारू पिण्यासाठी त्यांना आणखीन पैसे हवे होते. आणि त्यासाठीच ते बाहेर पडले होते. मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले समीर रॉय चौधरी त्यांच्या नजरेत पडले. या टोळक्याने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र जवळ पैसे नसल्याने समीर रॉय चौधरी देऊ शकले नाही. आणि त्यामुळे आरोपींनी त्यांचा खून केला. या घटनेनंतर भयभीत झालेल्या औंध मधील नागरिकांची पोलीस आयुक्तांनी भेट घेतली.आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :PuneपुणेAundhऔंधPoliceपोलिसcommissionerआयुक्तCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीSenior Citizenज्येष्ठ नागरिक