शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

पालखीला पालिकेकडूनच ‘गैरसोय’

By admin | Published: June 22, 2017 6:56 AM

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आलेली नव्हती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आलेली नव्हती, असा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमधून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली. वारकऱ्यांसाठी ना प्यायच्या पाण्याची व्यवस्था होती, ना आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या होत्या. मांडवही घालण्यात आलेले नसल्याचे सांगून महापौर काहीही ऐकून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र विरोधी पक्षाची भाषा चुकीची असल्याचा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षांनी वारकऱ्यांच्या झालेल्या गैरसोयीवर लक्ष वेधून महापौर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. सभात्यागाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव चांदेरे आणि शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. वारकऱ्यांना प्यायला पाणी नव्हते, औषधोपचार मिळाले नाहीत. पूर्वी शहरात १५० मांडव टाकण्यात येत असत, या वेळी केवळ ९० मांडव टाकण्यात आल्याचे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्वसाधारण सभेत महापौरांनी या विषयावर चर्चा होऊ दिली नाही, असेही ते म्हणाले.विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गेल्या ६० वर्षांत वारकऱ्यांची पहिल्यांदाच एवढी गैरसोय झाली असून, १५ वर्षांपासून महापालिकेत असलेल्या भाजपा सदस्यांना वारकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा द्यायच्या, याची माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. तर नाना पेठ, भवानी पेठेत वारकऱ्यांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागला, असे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी सांगितले.