शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांचा स्वातंत्र्यदिनी जलसमाधीचा इशारा; ६० वर्षांनंतरही त्यांच्या नावावर नाहीत सातबारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:59 IST

पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील 36 शेतकऱ्यांची 292 एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे

ठळक मुद्दे १२ ऑगस्ट पूर्वी जर धरणग्रस्तांच्या नावे सातबारे झाले नाहीत तर स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला पुन्हा एकदा धरणग्रस्त जलसमाधी घेणार

मार्गासनी: साठ वर्षानंतर देखील सातबारे नावावर न झाल्याने वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांनी स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे निवेदन तहसीलदार शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना दिले आहे. 

धरणग्रस्तांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील ३६ शेतकऱ्यांची २९२ एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे. येथील ३६ धरणग्रस्तांसाठी हवेली तालुक्यातील नांदोशी येथे सहा एकर जागेमध्ये गावठाण वसलेले आहे. याठिकाणी धरणग्रस्त अनेक वर्षापासून राहत आहे. परंतु या जागेच्या सातबारा उताऱ्यावर अद्याप मूळ मालकांच्या नोंदी आहेत ही जमीन धरणग्रस्तांच्या किंवा शासनाच्या नावावर अद्याप झालेली नाही.

मूळ मालकांच्या नावावर ती या जमिनी आहेत. या जमिनी वर धरणग्रस्तांची नोंद होऊन सातबारे धरणग्रस्तांच्या नावावर झाले पाहिजेत ही मुख्य मागणी धरणग्रस्तांची आहे. यासाठी १२ जुलै पानशेत प्रलय दिनाच्या दिवशी जलसमाधी आंदोलनाचा इशारा धरणग्रस्त कडून देण्यात आला होता.

परंतु जिल्हाधिकारी व धरणग्रस्त यांच्या मध्ये झालेल्या चर्चेमुळे आणि कोरोना महामारीच्या अनुषंगाने सामाजिक भान ठेवत धरणग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन रद्द केले. १२ ऑगस्ट पूर्वी जर धरणग्रस्तांच्या नावे सातबारे झाले नाहीत तर स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला पुन्हा एकदा धरणग्रस्त जलसमाधी घेणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.  

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरDamधरणSocialसामाजिकPoliceपोलिसGovernmentसरकार