शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
3
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
4
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
5
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
7
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
8
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
9
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
10
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
11
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
12
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
13
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
14
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
16
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
17
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
18
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
19
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
20
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन

HSC 12th Exam: बारावीचा निकाल वेळेवर लागणार; उत्तरपत्रिका वितरणासाठी पोस्टाची स्वतंत्र यंत्रणा, एस.टी.चा वापर नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 1:31 PM

पुणे : गेले चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी.च्या संपामुळे इयत्ता बारावीचा निकाल उशिरा लागेल, अशी शक्यता व्यक्त ...

पुणे : गेले चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी.च्या संपामुळे इयत्ता बारावीचा निकाल उशिरा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, उत्तरपत्रिकांच्या वितरणासाठी पोस्टाने यंदा स्वत:च्या वाहतूक यंत्रणेचा वापर केला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेतच प्रसिद्ध होईल. निकालावर एस.टी.च्या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षा झाल्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठविल्या जातात. त्यासाठी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्टाकडे जमा केले जातात. यापूर्वी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शिक्षकांकडे पाठविण्यासाठी एस.टी.चा वापर केला जात होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून एस.टी.चा संप आहे. त्यामुळे एस.टी.वर अवलंबून न राहता पोस्ट ऑफिसने स्वत:च्या वाहनांचा वापर करून शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.

उत्तरपत्रिका कशा पाठविल्या जातात ?

उत्तरपत्रिका पोस्टाकडून दिलेल्या पत्त्यावर विना विलंब पाठविल्या जातात. शिक्षक व मॉडरेटर यांना मोटारीच्या साहाय्याने विभागीय मंडळाकडे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोहोचविता येतात. त्याचा खर्चही राज्य मंडळाकडून दिला जातो.

''उत्तरपत्रिकांचे गठ्ठे एस.टी.ने पाठविले जात नाहीत. पोस्टाची स्वतंत्र वाहतूक यंत्रणा त्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत कोणत्याही अडचणी येत नाहीत. शिक्षक व मॉडरेटर वेळेत काम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर होण्यास कोणतीही अडचण नाही.''- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

''पोस्ट विभागाच्या लाल रंगाच्या वाहनांमधून बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची वाहतूक केली जात आहे. एस.टी.चा संप असल्याने पोस्ट कार्यालयाने स्वत:च्या वाहनांमधूनच ही वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे यंदा उत्तरपत्रिका वितरणासाठी एस.टी.वर अवलंबून राहावे लागले नाही.'' -आय. डी. पाटील, सहायक पोस्ट मास्तर, पुणे

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र