शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

भारतात चांगली अन् राहण्यायोग्य शहरे उभारण्यासाठी जागतिक निधी मिळणार; जी २०चा मुख्य उद्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 20:14 IST

भारत विकासाच्या मार्गावर असून, त्यासाठी जी २० अतिशय उपयुक्त ठरणार

पुणे : भविष्यात चांगली राहण्यायोग्य शहरे निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. त्या प्रकल्पांना जागतिक स्तरावरून फंडिंग मिळावे, यासाठी जी २० परिषदेचे आयोजन पुण्यात केले होते. त्यामध्ये सहभागी देशांनी त्यांच्या विकासाची मार्गदर्शक तत्त्वे सादर केली. त्याचा वापर करून भारतात तशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सोलोमोन ओकियोराज यांनी दिली.

पुण्यात दोन दिवस जी २० परिषद भरविली होती, त्याचा मंगळवारी समारोप झाला. त्यानंतर परिषदेत काय मुद्दे चर्चिले गेले, त्याविषयी सोलोमोन यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या परिषदेत जगभरातील ६४ प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले होते. या पहिल्या टप्प्यातील परिषदेनंतर मार्च २०२३ मध्ये दुसरी परिषद होणार आहे.

जी २० मध्ये सहभागी झालेल्या देशांसमोर भारतातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प सादर करण्यात आले. सहभागी देशांनीही त्यांच्याकडील विकासाच्या मॉडेलची माहिती दिली. पहिल्या दिवशीच्या कार्यशाळेत खासगी क्षेत्रातून गुंतवणूक वाढावी यावर चर्चा झाली. त्यात विविध गुंतवणुकीचे मॉडेल सादर झाले. या कार्यशाळेतील सर्व बाबींवर काम करून भविष्यातील प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी शहराच्या क्षमता विकास कशी करता येईल, यावर भर देण्यात आला.

सोलोमोन म्हणाले, दोन दिवस जी २० मधील देश पुण्यात होते. पुण्याचे वैभव पाहून त्यांनी कौतुक केले. आदरातिथ्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरे शाश्वत विकासाद्वारे कशी तयार केली जातील. त्यावर चर्चा झाली. त्यासाठी देशातील शहरांमध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी परदेशी गुंतवणूक कशी मिळवता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. भविष्यात शहरे चांगली करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून सर्व प्रकल्प साकार करण्यात येतील. प्रकल्पांना जागतिक फंडिंग मिळणे सोपे जावे म्हणून जी २० परिषद आयोजिली होती, असे सोलोमोन यांनी सांगितले.

सरकार गॅरंटीयर म्हणून काम करणार

आम्ही देशातील चांगल्या महापालिकांची यादी केली असून, ज्यांचा क्रेडिट रेट चांगला आहे, त्यांच्या प्रकल्पांमध्ये परदेशी गुंतवणूक यावी म्हणून सरकार गॅरंटीयर म्हणून काम करणार आहे. भारत विकासाच्या मार्गावर असून, त्यासाठी जी २० अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

वर्ल्ड बँकेकडून निधी

चांगल्या सुविधा मिळतात, म्हणून नागरिक शहराकडे वळत आहेत. तो शहरात येतो, तेव्हा त्याला शहरांमध्ये चांगल्या सोयी मिळाव्यात, यासाठी काम करण्यात येणार आहे. त्यांना ज्या सुविधा हव्यात, त्या उभारण्यासाठी किती निधी लागेल, यावर जी २० मधून मदत मिळणार आहे. आताही अनेक शहरांमधील वाहतूकव्यवस्था, जल व्यवस्थापन आदी प्रकल्पांसाठी वर्ल्ड बँकेकडून निधी मिळत आहे.

टॅग्स :PuneपुणेInternationalआंतरराष्ट्रीयMONEYपैसाIndiaभारतSmart Cityस्मार्ट सिटी