शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भारतीय अधिराज्य गाजवतील

By admin | Published: March 12, 2016 12:41 AM

भारतीयांत प्रचंड क्षमता असल्याने भारतीय नागरिक आगामी काळात जगावर बौद्धिक अधिराज्य गाजवतील. संगणक क्षेत्रात भारतीय संशोधकांनी आघाडी घेतली

पिंपरी : भारतीयांत प्रचंड क्षमता असल्याने भारतीय नागरिक आगामी काळात जगावर बौद्धिक अधिराज्य गाजवतील. संगणक क्षेत्रात भारतीय संशोधकांनी आघाडी घेतली आहे. सद्य:स्थितीत रोबोटमध्ये बौद्धिक क्षमता टाकण्याचे संशोधन होण्याची गरज आहे. यासाठी संशोधक, तंत्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, उद्योजकांनी एकत्रित येऊन नागरिक केंद्रबिंदू ठेवून काम करण्याची वेळ आली आहे, असे मत शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बाबूरावजी घोलप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फंक्शनल इको फ्रेंडली स्मार्ट इमरजिंग मटेरियल्स एफ.ई.एस.ई.एम. - २०१६ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आय. आय. एस. ई. आर.चे संचालक डॉ. के. एन. गणेश, जपानचे प्रा. योशिदा हायसो, दक्षिण कोरियाचे प्रा. डॉ. सॅन वॉन रयू, प्रा. डॉ. वाय. एच. जेऊंग, अमेरिकेचे डॉ. अशोक जोशी, आॅल इंडियारबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अब्बास बुटावाला, डॉ. गोपीनाथन, डॉ. मिलिंद कुलकर्णी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहन देशमुख, प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, उपप्राचार्य डॉ. एस. डी. आघाव आदी उपस्थित होते. डॉ. के. एन. गणेश म्हणाले की, नॅनो टेक्नॉलॉजी ही काळाची गरज आहे. ऊर्जा, संवर्धन आणि संसाधन विकासातूनच स्मार्ट मटेरियल मिळवून ऊर्जेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अब्बास बुटावाला म्हणाले की, कलकत्ता येथील आॅल इंडिया रबर इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यालय पुण्यात स्थलांतरित झाल्याने पुणे आणि परिसरातील रबर उद्योगास चालना मिळेल. या अंतर्गतच बा. रा. घोलप महाविद्यालयात प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिक, प्रशिक्षित मनुष्यबळ उभे राहील व भविष्यातपुणे रबर हब म्हणून ओळखले जाईल. डॉ. वैशाली नाईक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. डी. आघाव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)