शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

आषाढीवारी सोहळ्याच्या तोंडावर इंद्रायणीची 'हिमनदी'! रसायनयुक्त फेसाने भाविकांची होणार गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 1:18 PM

पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील औद्योगिक कारखान्यांचे केमिकलयुक्त तसेच नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे....

आळंदी (पुणे) : यंदाचा आषाढी पायीवारी सोहळा अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. अशातच जलप्रदूषणामुळे आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी रसायनयुक्त फेसाने फेसाळलेली आहे. आळंदीत वाहणारे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी व पाण्यावर तरंगणारा रसायनयुक्त फेस हे वर्णन कुठल्यातरी गटारीचे नसून पवित्र इंद्रायणी नदीचे आहे. पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील औद्योगिक कारखान्यांचे केमिकलयुक्त तसेच नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे.

मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायनमिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे. अगदी पाण्यावर तरंगणारा फेस पाहून समक्षदर्शींना बर्फाच्छादित भागाची आठवण होत आहे.

इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दूरगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोअर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष घालणार का? असा सवाल स्थानिक जनतेकडून उपस्थित होत आहे.

उदासीनता दूर होणार का?

आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येत्या २९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीत दाखल होऊन सोहळ्यानिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करणार आहेत. विशेषतः अनेक भाविक नदीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र सद्यस्थितीतील इंद्रायणीची अवस्था पाहता भाविकांनी स्नान किंवा पाणी प्राशन करावे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. तर दुसरीकडे राज्यसरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा, एवढीच स्थानिक जनता व वारकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.

उपाययोजना न केल्याने नाराजी

आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा केला आहे. विशेषतः पावसाळी अधिवेशनात तारांकित व नागपुरातील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून स्थानिकांची व वारकऱ्यांची भूमिका खंबीरपणे मांडली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही संबंधित मंत्रिमहोदयांनी दिली होती. मात्र अद्यापही संबंधित विभागाकडून कोणतेही उपाययोजना आखलेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड