शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

जैन संघटनेचे काम प्रेरणादायी

By admin | Published: November 23, 2015 2:07 AM

भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूरच्या भूकंपग्रस्त भागातील मुलांचा सांभाळ करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. ही संघटना संकटात सापडलेल्या

पुणे : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूरच्या भूकंपग्रस्त भागातील मुलांचा सांभाळ करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. ही संघटना संकटात सापडलेल्या लोकांच्या पाठीशी उभी राहते. हे काम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शासनाकडून संकटकाळात मदत दिली जाते. मात्र, समाजाचा हातभार लागत नाही तोपर्यंत त्या कामाला गती येणार नाही, असेही पवार म्हणाले.भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाबूराव पाचरणे, जगदीश मुळीक, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था व अन्य मान्यवर उपस्थित होते.राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्यामुळे दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या समितीतील सदस्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, समितीकडून राज्य व केंद्र सरकारला योग्य अहवाल सादर केला जाईल. राज्यातील लोकप्रतिनिधीही केंद्रात याप्रश्नी पाठपुरावा करतील. आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिलेली आहे, असे सांगून ते म्हणाले, संकटकाळात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. बापट म्हणाले, की मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकविणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शासनाच्या मदतीला मर्यादा असतात. परंतु, शासनाची मदत न घेता उपकाराच्या नाही, तर कर्तव्याच्या भावनेतून बीजीएस काम करत आहे.