लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल येत्या आठवड्यात परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाणार आहे.त्यानंतर महिन्याभरात गुणवत्ता यादी प्रसिध्द करून शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची घोषणा केली जाईल.परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणा-या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ९ लाख ४८ हजार २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला होता. शिक्षण विभागातर्फे यंदा प्रथमच चौथी ऐवजी पाचवीच्या विद्यार्थ्यांची आणि सातवी ऐवजी आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. राज्यातील ५ लाख ४५ हजार ३५९ पाचवी विद्यार्थ्यांनी तर आठवीच्या ४ लाख २ हजार ८७७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेस अर्ज केला होता. सर्व विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. यंदा प्रथमच ५वीच्या आणि ८वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल येत्या आठवड्यात
By admin | Published: May 11, 2017 4:33 AM