शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय

By admin | Published: October 14, 2015 3:26 AM

औद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले.

प्रवीण गायकवाड, शिरूरऔद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले. मात्र, या वाढत्या औद्योगिकीकरणासाठी दळणवळणाचे साधन असलेला पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय बनू लागला आहे. याचा परिणाम नवीन उद्योग तालुक्यात येण्यास तयार नाहीत, तर आहे ते उद्योग स्थलांतराच्या विचारात असल्याचे चित्र आहे. २००० साली रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीची सुरुवात करण्यात आली. पंचतारांकित दर्जा असलेल्या या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर बहुराष्ट्रीय कारखान्यांचे जाळे विखुरले आहे. या वसाहतीमुळे शासनाने दळणवळण सुरळीत होण्याकरिता शिरूर-पुणे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही केले. हा रस्ता तयार करताना शासनाने अनेक त्रुटी ठेवल्या, असे आता जाणवते. विदर्भ-मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या या रस्त्यावर दिवसागणिक वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रस्ता तयार करणे गरजेचे होते. तसेच या रस्त्यावर असणाऱ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपुलाची सुविधा निर्माण करणेही आवश्यक होते. मात्र, केवळ चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्याच्या रुंदीचे निकष पाळण्यात आले नाही. २००५ ते २०१४ पर्यंत या रस्त्यावर पेरणे फाटा (२०१० पर्यंत रांजणगाव येथेही) येथे टोलनाका होता. या नाक्यावरील ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागायच्या, हाही एक मोठा अडथळा होता. संध्याकाळी घरीही वेळेवर पोहोचता येत नाही. यामुळे हा अधिकारीवर्ग तसेच इतर कर्मचारीही त्रासलेले आहे. असहाय असल्याप्रमाणे ते हे सर्व सहन करीत आहेत.