शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

"पाशवी बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबणे योग्य नव्हे", अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 6:27 PM

मतदाराने सुजाण होऊन लोकशाही, संविधान व त्याचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे

पुणे: गेल्या नऊ वर्षात प्रशासन प्रतीकवादी, तर माध्यमे प्रतिक्रियावादी झाली आहेत. न्यायपालिका व स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर अनेकदा शंका उपस्थित होत आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. मतदाराने सुजाण होऊन लोकशाही, संविधान व त्याचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. पाशवी बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबणे योग्य नाही, असे परखड मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. कॅलिडस मीडिया अँड आर्टस् अकॅडमीतर्फे 'भारतीय लोकशाहीत संसदीय चर्चेचे महत्व' या विषयावर आयोजित संवाद कार्यक्रमात डॉ. कोल्हे बोलत होते. 

डॉ. कोल्हे म्हणाले, संसदीय चर्चेतून नागरिकांचे प्रश्न सोडविता येतात. त्यातून अनेक धोरणात्मक कार्याची उभारणी होते. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतात लोकशाही सुदृढ होण्यासाठी सर्वसमावेशक संसदीय चर्चा अत्यंत गरजेची आहे. मात्र, सध्या संसदीय चर्चेचे महत्व कमी होतेय का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे," "संसदीय चर्चेत अनेक आयुधे आहेत. त्याचा बखुबीने वापर करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. अभ्यासू नेते घडवण्याची ताकद मतदारांमध्ये असते"

ॲड. असीम सरोदे म्हणाले, "लोकांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी यांच्यावर आहे. सगळे प्रश्न न्यायालयात सुटत नाहीत, काही प्रश्न धोरणात्मक पातळीवर संवादातून सुटतात. संसदीय प्रणालीत चर्चा होऊन प्रश्न सुटायला हवेत. लोकांचा सहभाग त्यात असायला हवा. बहुमताच्या जोरावर अनेक विधेयके चर्चेविना रेटून नेले जातात, हे योग्य नाही. लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न घटनेला धोकादायक आहे. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त भारतासाठी आपण सगळ्यांनी जागरूक व्हायला हवे. एक दिवसाचा राजा आणि इतर दिवसांचा सामान्य नागरिक ही मतदारांची ओळख पुसायला हवी."

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस