शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

न्यायालयात न्याय मिळतो, असे नव्हे! वकिलीचा झाला व्यापार: न्या. धनंजय चंद्रचूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 05:58 IST

मध्यस्थ म्हणून कायदा जाणणाऱ्या लोकांबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सुबुद्ध नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : न्यायालयात जाऊनच न्याय मिळतो, असे नाही. तर सामाजिक प्रक्रियेतूनही प्रश्न सुटू शकतात. मध्यस्थ म्हणून कायदा जाणणाऱ्या लोकांबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सुबुद्ध नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी व्यक्त केले. इंडियन लॉ सोसायटीच्या (आयएलएस) शताब्दीनिमित्त ‘देशात मध्यस्थाचे भवितव्य’ या विषयावरील व्याख्यानात न्यायमूर्ती चंद्रचूड बोलत होते.  

इंडियन लॉ सोसायटीज् सेंटर फॉर आर्बिट्रेशन अँड मिडिएशनचे (इल्स्का) उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर, उपाध्यक्ष पी. व्ही. करंदीकर, प्राचार्य वैजयंती जोशी, संचालक सत्या नारायण उपस्थित होते.

देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये ४ कोटी, उच्च न्यायालयांमध्ये १ कोटी आणि सर्वोच्च न्यायालयात ७२ हजार खटले अजूनही प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या नेहमीच्या प्रक्रियेतून हे खटले लवकर मार्गी लागणे शक्य आहे असे वाटत नाही, असे सांगून न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, आपल्या समाजाची रचना विषम असल्याने त्यांच्याकडील साधनेही विषम आहेत. मालक आणि कामगार, घरमालक आणि भाडेकरू किंवा अगदी पती-पत्नी यांच्यातील एक पक्ष नेहमीच अशक्त ठरू शकतो. व्यावसायिक भागीदार आणि पती-पत्नी यांच्यात विसंवाद होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. अशा वेळी मध्यस्थ गरजेचा असतो. तसेच  न्यायालयीन मध्यस्थाची भूमिका वठवताना आपली कृती ही राज्यघटनेशी सुसंगत अशीच  असली पाहिजे. घटनाबाह्य वर्तन घडणार नाही, याची काळजी देखील घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वकिलीचा झाला व्यापार

अलीकडच्या काळात वकिली क्षेत्राचे रुपांतर व्यवसायाकडून व्यापाराकडे झाले आहे. न्यायदानाच्या क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता जपली पाहिजे. वकील, न्यायाधीश, न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ यांनी सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेत कायदा सांगितला पाहिजे. याकडेही  चंद्रचूड यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Puneपुणे