शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत

By राजू इनामदार | Updated: June 9, 2023 17:04 IST

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघतात, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जातात, यामुळे सामाजिक वातावरण बिघडते

पुणे: औरंगजेबाच्या औलादी अचानक आल्याच कशा? असा प्रश्न गृहमंत्रीच करत असतील तर जनतेने काय करायचे? अत्याधुनिक साधनांचा वापर करा व शंका आहे तर त्यांचा शोध घ्या असे आवाहन काँग्रेसने सरकारला केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. गृहखाते त्यासाठीच आहे. औरंगजेबाच्या औलादी एकदम कशा आल्या असा प्रश्न दंगलींच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी केला, पण याच काय कोणत्याही गुन्ह्याचा शोध घेण्याचे काम गृहखात्याचेच आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापक करून गृहमंत्र्यांनी याचा शोध घ्यावा असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले.

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघत आहेत, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जात आहेत, यामुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. याला जबाबदार कोण आहे याचाही गृहखात्याने विचार करावा. विशिष्ट विचारांना खतपाणी मिळेल असे सरकारकडून केले जात आहे का याकडे सरकारने बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. दंगल नियंत्रणाबाबत मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर गंभीर ताशेरे ओढले. नको त्या शब्दांमध्ये संभावना केली, त्यानंतर तरी सरकार गंभीरपणे वागेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले.

भारतीय प्रशासकीय तसेच भारतीय पोलिस सेवेत वरिष्ठ पदावर येताना देश, देशाची घटना याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शपथेचे स्मरण कायम ठेवावे, सत्ताधाऱ्यांकडून घटनाबाह्य, भविष्यात गंभीर होतील अशा गोष्टी घडत असतील तर त्याची त्यांना वेळीच पूर्वसुचना द्यावी असे आवाहनही तिवारी यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस