शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

त्रास झाला नाही तर लशीचा परिणाम नाही, हा गैरसमजच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी की नाही? घेतली तर त्रास होतो का? मग न घेतलेलीच बरी! ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी की नाही? घेतली तर त्रास होतो का? मग न घेतलेलीच बरी! मला काहीच झाले नाही, मग कशाला पाहिजे लस? कोरोनाबाधितांची संख्या वाढत असूनही अशा प्रश्नांचे गुऱ्हाळ मात्र संपायला तयार नाही.

या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांबरोबर लोकमतने संपर्क साधला. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे गैरसमज दूर करताच लस का गरजेची आहे, याचेही सविस्तर स्पष्टीकरण दिले. कोरोनाला हरवायचे असेल तर सर्वांनीच मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

* लस घेतल्यावर होणारा त्रास एक किंवा फार तर दोन दिवसांच्या वर टिकत नाही. साध्या औषधांनी तो बराही होतो. त्यामुळे त्रासाचे कारण देत लस टाळणे चुकीचे आहे.

* लशीची अॅलर्जी असणे असे उदाहरण लाखात एक म्हणजे अगदीच दुर्मिळ आहे. लशीची अॅलर्जी आहे, असे काहीच नसते.

* लस म्हणजे तेच विषाणू सौम्य प्रमाणात शरीरात सोडतात. त्यामुळे या प्रकाराशी आपल्याला सामना करायचा आहे, असे शरीरात निश्चित होते. मग त्यानंतर तोच विषाणू अन्य मार्गाने शरीरात प्रवेश करता झाला, तर त्याची मात्रा चालत नाही किंवा अगदी कमी चालते. लस घेण्याचा हा मोठाच फायदा आहे.

* असाध्य आजार असलेल्यांनी प्राधान्याने लस घ्यायला हवी. कोरोना विषाणू अशा कमकुवत झालेल्या गोष्टींवर, त्यातही किडनी वगैरेवर हल्ला करतो.

* कोरोना विषाणू काही वय पाहून हल्ला करत नाही. तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी लस हाच सध्याचा एकमेव उपाय आहे.

* विषाणू जवळ येऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर, गर्दी टाळणे व लस घेणे ही चतु:सूत्री पाळली तर आपण कोरोनाचा नक्की पराभव करू शकतो.

डॉ. अच्युत जोशी

कन्सल्टिंग फिजीशियन

----//

* लस दिल्यानंतर शरीरात बाहेरून येणाऱ्या विषाणूंच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिपिंड (अँटिबॉडिज) तयार होतात. कोरोना विषाणूचा प्रतिरोध करण्यासाठी हे गरजेचे आहे.

* लस घेतली तिथे दंड दुखतो. काहींना अंगदुखी किंवा डोके दुखायला लागते. हे प्रमाण कमी आहे. मात्र त्रास झाला की लस परिणामकारक व नाही झाला तर लशीचा उपयोग झाला नाही हा गैरसमज आहे.

* मधुमेह किंवा असा आजार असलेल्यांनी प्राधान्याने लस घ्यायला हवी. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते.

* लस घेतली याचा अर्थ कोरोनापासून १०० टक्के सुरक्षित असे नाही. तरीही कोरोना होऊ शकतो, पण त्याची तीव्रता एकदम कमी असेल. मात्र अशी उदाहरणे कमी आहेत.

* कोरोना झाला असेल तर लगेच लस घेऊ नये. त्यातून पूर्ण बरे झाल्यावर साधारण ३ ते ४ महिन्यांनी लस घेणे योग्य आहे.

डॉ. बाळासाहेब देशमुख

अध्यक्ष- इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखा

---///

* लस दोन वेळा घेण्यामागे शास्रीय कारण आहे. लशीचे संशोधन झाल्यावर तिचा किती परिणाम लस घेणाऱ्याच्या शरीरावर होणार, म्हणजे किती अँटिबॉडीज तयार होणार हेही निश्चित होत असते. त्यावरून किती डोस द्यायचे हे ठरते. दुसरा डोस हा पहिल्या डोसचा परिणाम वाढवणारा असतो.

* याच कारणासाठी पहिला डोस घेतल्यानंतर दिलेल्या मुदतीनंतर दुसरा डोस घेणे गरजेचे असते. कारण त्यातून पहिल्या डोसमुळे तयार झालेल्या अँटिबॉडीजना बळ मिळणार असते. म्हणूनच पहिला डोस घेतल्यावर दिलेल्या मुदतीत दुसरा डोस घ्यायलाच हवा. त्याशिवाय सुरक्षेचे वर्तुळ तयार होणार नाही.

* पहिला डोस घेतला आणि दिलेल्या मुदतीत दुसरा मिळाला नाही तरी त्याचा दुष्परिणाम काहीच नाही. उलट पहिल्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणाराच असतो. तीन महिन्यांनंतर दुसरा डोस घेतला तरी चालेल.

* आता काही कंपन्या फक्त एकच डोस पुरेसा असलेल्या लशींचे उत्पादन करत आहेत. त्यावरचे त्यांचे संशोधन पूर्ण झाले आहे. या लसींचा एकच डोस घेतला तरी चालू शकते, कारण ते संशोधनातून ठरलेले असते.

* कोरोना विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे तो शरीरातील काही अवयवांवर थेट आघात करतो व ते कमकुवत करतो किंवा त्यांचे कार्य पूर्ण थांबवतो. त्यामुळेच आधीच अनियंत्रित मधुमेह, किडनी किंवा तत्सम आजारांनी कमकुवत झालेल्या रूग्णांनी तर ही लस प्राधान्याने घ्यायलाच हवी.

* लसीकरण ऐच्छिक आहे. पण कोरोना विषाणूचा संसर्ग करण्याचा वेग लक्षात घेता, प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे गरजेचेच आहे. ते राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजले गेले तरी हरकत नाही.

- डॉ. सुभाष साळुंखे,

माजी महासंचालक, आरोग्य

विद्यमान तांत्रिक सल्लागार, कोरोना राज्य कक्ष