शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावा’ जयंत पाटलांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 09:08 IST

वॉर्डरचना कशीही झाली तरी आम्ही घाबरत नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले....

पुणे : तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीच वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री असताना तेच पूर्वीच्या रचनेला विरोध करत आहेत. महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावावा. आपले पाप आपल्याच पारड्यात पडेल याची भीती आहे. त्यामुळे वॉर्डरचना कशीही झाली तरी आम्ही घाबरत नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

शहर राष्ट्रवादीच्या २१ कार्यकारिणीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, दीपाली धुमाळ, अश्विनी कदम, मृणालिनी वाणी, नीलेश कदम आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘कर्नाटक विधानसभेचा निकाल पाहता आगामी महापालिका निवडणुका लवकर घेतील, याचे धाडस हे सरकार करणार नाही. दलबदल, पक्षबदल केलेल्यांचा तेथे पराभव झाला आहे. राज्यातही तीच स्थिती राहणार आहे. त्यांच्याकडील नेते कधी आपल्याकडे येतील, हेही त्यांना कळणार नाही.

दरम्यान, बूथ कमिटीचे महत्त्व सांगत पाटील यांनी तत्काळ बूथ कमिटीच्या नियुक्त्या पूर्ण करा. सर्व शाखांनी एकत्र बसून एक जूनपर्यंत बूथ अध्यक्ष नेमावेत. वॉर्डनिहाय बैठका घ्याव्यात. पक्षाला मानणाऱ्या नागरिकांकडून त्यांची मते जाणून घ्यावीत. देशातील प्रश्नांबाबत चर्चा करावी. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम वाॅर्डावाॅर्डांत राबवा, पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

ज्या पक्षात चर्चा विनिमय होते, तो पक्ष वैचारिकदृष्ट्या भक्कम असतो, असेही पाटील म्हणाले. पुणे शहरात राष्ट्रवादी मोठा पक्ष म्हणून निवडून येईल, अशी खात्री आहे. पालिकेत चांगला कारभार करायची भाजपला संधी देऊन झाली आहे. आता पुणेकर राष्ट्रवादीला पूर्ण बहुमताने संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नार्वेकर आपले जावई :

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. ‘रिझनेबल’ मुदतीत हा निर्णय घ्यायचा आहे. विधानसभा अध्यक्ष न्याय व्यवस्था धाब्यावर बसवतील, असे वाटत नाही. तसेच, नार्वेकर हे आपले जावई आहेत. त्यांनी आपल्याकडून लोकसभा, विधानसभा लढवली आहे. ते आपल्या सद्भावनांची दाखल घेतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र