शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

आताच निवडणुका झाल्यास भाजपला ६० जागाही मिळणे कठीण : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 10:20 IST

सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले...

पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आताच निवडणुका घेतल्यास विधानसभेत भाजपचे ६० पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, असे भाकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटक निकालामुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लवकर होईल, याविषयी शंका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, राज्यात ध्रुवीकरण होणार नाही. लोकांना विकास हवा आहे. महागाई कमी करणारे निर्णय हवे. देशात सध्या जे सुरू आहे, ते नागरिकांना मान्य नाही. त्यामुळे एकहाती सत्ता दिली. मात्र, त्याचा योग्य वापर करीत नाही, हे स्पष्ट होत आहे. राज्यात सध्या निवडणुका घेतल्यास भाजपला ३५ टक्क्यांपेक्षा जास्त मते पडणार नाहीत, असे मी विश्वासपूर्वक सांगतो. त्याचप्रमाणे दंगली नियंत्रण करता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे, असा आरोपही त्यांनी केला.

‘ईडी’ला सामोरे जाणार

‘ईडी’ची नोटीस आली आहे. येत्या २२ तारखेला चौकशीला सामोरे जाणार आहे; पण ज्या कंपनीशी काहीच संबंध नाही. त्यांनी नोटीस का पाठविली आहे, त्याची माहिती घेत आहे. मात्र, एजन्सीला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस