शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अकार्यक्षमतेमुळे ‘वेदांता’ गुजरातला : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:05 PM

राजकीय विचार बदलले की ईडी साॅफ्ट..

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकार्यक्षमतेमुळेच महाराष्ट्रात येणारा वेदांता-फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेला आहे. यासाठी दिल्लीतूनही दबाव आला हाेता. महाराष्ट्रातील ३ ते ४ लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

पुण्यात द डेक्कन शूगर टेक्नाॅलाॅजिस्ट असोसिएशनच्या वार्षिक साखर परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे प्रचारासाठी विदर्भात गेले, ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या पक्षासाठी काम करावे. त्यांनी तसे केले, तर आनंदच होईल, असेही पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले...

- सरकारमध्येच मतभिन्नता असेल, त्यामुळेच सरकार स्थापन होऊनही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळेनात. त्यामुळे जिल्ह्यांतील अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत.

- शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत आले आहेत. त्यांची एक परंपरा आहे. आता शिवसेनेतून कोणी फुटून बाहेर पडले असेल, तर त्यांनी त्यांचा मेळावा दुसऱ्या मैदानावर घ्यावा. परंपरागत क्लेम शिवसेनेचाच आहे, शिंदे गटाने वेगळ्या ठिकाणी मेळावा घ्यावा.

राजकीय विचार बदलले की ईडी साॅफ्ट

ईडी प्रताप सरनाईक यांच्या मागे लागली होती. आता त्यांच्यात कोणताही दोष नसल्याचा निष्कर्ष ईडीने काढला आहे. त्यांचे प्रकरण बंद केले जात आहे. हे परिवर्तन का झाले, हे देशाला समजत आहे. ईडीचा गैरवापर होत असल्याचे हे उदाहरण आहे. राजकीय विचार बदलले की ईडी साॅफ्ट होते, असेही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेJayant Patilजयंत पाटीलFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा