शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

JEE Exam| जेईई ॲडव्हान्स परीक्षेतील त्रुटींमुळे विद्यार्थी न्यायालयात; आज हाेणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 08:35 IST

दखल न घेतल्याने याचिका...

पुणे : आयआयटी मुंबईने नुकतीच जेईई ॲडव्हान्स परीक्षा घेतली. या परीक्षेत अनेक तांत्रिक त्रुटी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी काही पालक आणि विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी गुरुवारी म्हणजे आज हाेणार आहे.

आयआयटी मुंबईने २८ ऑगस्ट रोजी विविध केंद्रांवर जेईई ॲडव्हान्सची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न झूम इन होणे, परीक्षा सुरू असताना स्क्रीनवर एकही प्रश्न न दिसणे, माऊस व्यवस्थित न चालणे अशा अनेक अडचणी आल्या होत्या. अनेक तांत्रिक दोषांचाही सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. त्या तक्रारी आयआयटीकडे केल्या तरी त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सोडविता आली नाहीत. परीक्षेवर लक्ष केंद्रीत करता आले नाही. त्यामुळे त्यांची चूक नसतानाही गुणांवर परिणाम हाेऊ शकताे, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. जेईई ॲडव्हान्सची परीक्षा देशभरात एकाचवेळी घेण्यात आली हाेती व तिचा निकाल ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक दोषांअभावी पेपर सोडविता आला नाही, त्यांचे यात नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा तांत्रिक दोषांमुळे त्यांचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या पालकांनी विचारला आहे. त्याची सुनावणी होणार असल्याची माहिती डॉ. गोरख झेंडे या पालकांनी दिली.

दखल न घेतल्याने याचिका

नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. परीक्षा नियंत्रण समितीकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ५ सप्टेंबर रोजी ॲड. प्रांजल खटावकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाCourtन्यायालय