शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

JEE Exam| जेईई ॲडव्हान्स परीक्षेतील त्रुटींमुळे विद्यार्थी न्यायालयात; आज हाेणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 8:30 AM

दखल न घेतल्याने याचिका...

पुणे : आयआयटी मुंबईने नुकतीच जेईई ॲडव्हान्स परीक्षा घेतली. या परीक्षेत अनेक तांत्रिक त्रुटी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी काही पालक आणि विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी गुरुवारी म्हणजे आज हाेणार आहे.

आयआयटी मुंबईने २८ ऑगस्ट रोजी विविध केंद्रांवर जेईई ॲडव्हान्सची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न झूम इन होणे, परीक्षा सुरू असताना स्क्रीनवर एकही प्रश्न न दिसणे, माऊस व्यवस्थित न चालणे अशा अनेक अडचणी आल्या होत्या. अनेक तांत्रिक दोषांचाही सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. त्या तक्रारी आयआयटीकडे केल्या तरी त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सोडविता आली नाहीत. परीक्षेवर लक्ष केंद्रीत करता आले नाही. त्यामुळे त्यांची चूक नसतानाही गुणांवर परिणाम हाेऊ शकताे, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. जेईई ॲडव्हान्सची परीक्षा देशभरात एकाचवेळी घेण्यात आली हाेती व तिचा निकाल ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक दोषांअभावी पेपर सोडविता आला नाही, त्यांचे यात नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा तांत्रिक दोषांमुळे त्यांचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या पालकांनी विचारला आहे. त्याची सुनावणी होणार असल्याची माहिती डॉ. गोरख झेंडे या पालकांनी दिली.

दखल न घेतल्याने याचिका

नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. परीक्षा नियंत्रण समितीकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ५ सप्टेंबर रोजी ॲड. प्रांजल खटावकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाCourtन्यायालय