शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

"नुसतंच बाळासाहेबांचे विचार"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 2:59 PM

महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाचा धाकच राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले. 

पुणे - राज्यातील दुकाने आणि आस्थापना यावरील पाट्या मराठी भाषेत ठळक अक्षरात लावा, सरकारच्या कायद्याचे पालन करा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यासाठी, व्यापारांना २ महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत संपूनही अनेक दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत. त्यामुळे, काही शहरांत मनसेने आक्रमक पवित्रा घेत काहीठिकाणी पाट्या फोडल्या. याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाचा धाकच राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील मराठी पाट्यांसदर्भात मुंबई, ठाण्यासह पुणे जिल्ह्यात मनसैनिक आक्रमक झाले आहेत. ज्या दुकानांवर मराठी बोर्ड दिसत नाही, तिथे खळखट्याक करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी थेट नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आले होते, त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज यांनी राज्य सरकारचा धाक उरला नाही, असे म्हटले. तसेच, मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं काम हे सरकार करत असल्याचा टोलाही लगावला.  मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायला आपलं सरकार आहे. नुसतं बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार बोलायला आहेत. कोर्टाने सांगूनही सरकारला मराठी पाट्यांची सक्ती करता येत नाहीत. ज्यावेळी मी मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले होते, तेही काढता आले नाहीत. नुसतं बोलायचे बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना, असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

ज्यावेळी, आम्ही मराठी पाट्यांचं आंदोलन केलं होतं तेव्हा मराठीत पाट्या लागल्या होत्या ना. आता, शासनाचा धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही. कोर्टाची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, शासनाची भीती नाही. मग, आपण अराजकाकजे जाऊ, असे म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेmarathiमराठीCourtन्यायालय