शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

हिंदुत्व-बाळासाहेबांचे मुद्दे सोडले, उद्धव ठाकरे लोकांच्या नजरेत काय राहिले: कालीचरण महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 21:36 IST

समान नागरी कायदा झालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केली.

Kalicharan Maharaj: महाराष्ट्रातील नवीन सरकारने लवकरात लवकर धर्मकार्य करीत रहावे. आपली ५ लाख मंदिरे परत घेण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण गोहत्या बंदीचा कायदा बनवावा आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा कालीचरण महाराज यांनी व्यक्त केली. यासह कालीचरण महाराज यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

अजित पवार सरकारसोबत आले आहेत याबद्दल ते म्हणाले, दोन लोक भरपूर धार्मिक असतील, तर तिसरा नास्तिक आला तर तोही धार्मिक बनून जाईल. धार्मिक, अध्यात्मिक, हिंदूवादी लोकांच्या मध्ये येऊन तेही धार्मिक, हिंदूवादी बनतील, अशी आशा करतो, असा विश्वास व्यक्त करताना, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरेंचे मुद्दे सोडले, त्यामुळे लोकांच्या नजरेत काय राहिले, अशी टीका कालीचरण महाराजांनी केली. 

समान नागरी कायदा झालाच पाहिजे

जोपर्यंत सीएए, एआरसी, युसीसी लागत नाही, तोपर्यंत जनतेने कर देणे बंद करून टाकावे. आपले पैसे 'त्या' लोकांसाठी नाहीत. घुसखोर व देशद्रोही आहेत, त्यांच्यासाठी आपले पैसे नाहीत. आपला पैसा हिंदू रक्षणासाठीच खर्च करा, असे आवाहन करीत समान नागरी कायदा झालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केली. 

दरम्यान, अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे मंडईमध्ये बुरुड आळीत सुरु असलेल्या म्हसोबा उत्सवात दीप अमावस्येनिमित्त १ हजार दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. यावेळी कालीचरण महाराजांच्या हस्ते म्हसोबारायांची आरती देखील करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सुर्यवंशी, जाधव कुटुंबीयांनी  कालीचरण महाराजांचे पाद्यपूजन केले. विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या शिवशंकरांच्या आकर्षक पुष्पसजावटीमध्ये विराजमान झालेल्या म्हसोबारायांचे मंदिर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाले होते. शिवशंकरांच्या पुष्पप्रतिकृतीसोबतच अग्रभागी २ नंदी आणि २ त्रिशुळाच्या पुष्पप्रतिकृती देखील साकारण्यात आल्या आहेत, त्या देखील दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. 

 

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना