शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

‘कळमोडीचे’ही पाणी रोखले!

By admin | Published: November 11, 2015 1:44 AM

भामा आसखेडमधून सोडण्यात येणारे पाणी सर्वपक्षीयांनी सोमवारी रोखल्यानंतर मंगळवारी कळमोडी धरणातून गेल्या तीन-चार दिवसांपसून होणारा विसर्ग तेथील ग्रामस्थांनी बंद केला

चासकमान : भामा आसखेडमधून सोडण्यात येणारे पाणी सर्वपक्षीयांनी सोमवारी रोखल्यानंतर मंगळवारी कळमोडी धरणातून गेल्या तीन-चार दिवसांपसून होणारा विसर्ग तेथील ग्रामस्थांनी बंद केला. विनंती करूनही अधिकारी मानत नसल्याने त्यांनी धरणावरून जाऊन व्हॉल्व्ह बंद केला.७ नोव्हेंबर रोजी धरण प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना पूर्व कल्पना न देताच कळमोडी धरणातून १९४ क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात केली. यावर ग्रामस्थांनी धरण अधिकाऱ्याला पाणी बंद करण्याची विनंती केली. परंतु, विनंती करूनही पाणी बंद न केल्यामुळे कळमोडी, चिखलगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. कळमोडी धरणाचे शाखा अभियंता बारवे यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता ग्रामस्थांनी पाणी बंद केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ग्रामस्थांबरोबर चर्चा करून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे सांगितले.येथील सर्व ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय दूध धंदा आहे. पाणीच जर शिल्लक राहिले नाही, तर मुक्या जनावारांच्या पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यांनी काय मरायचे काय? असा सवाल ग्रामस्थांनी केला. लक्ष्मणराव मुके, बाळासाहेब गोपाळे, सदाशिव शेलार, गणपत गोपाळे, काशीनाथ गोपाळे, बाळशीराम गोपाळे, प्रभाकर गोपाळे यांसह दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)1उन्हाळा अखेरीस दर वर्षी या धरणातून पाणी सोडले जायचे. मग या वर्षीच लवकर पाणी सोडण्याची बुद्धी का सुचली? हा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. आमच्या जमिनी पाण्यात गेल्या, त्याचा मोबदला अजून आम्हाला मिळाला नाही. आता आमच्या हक्काचे पाणी आहे, ते पळवा व आम्हाला उपाशी मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.