शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

kartiki wari 2021: यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर, वारी होणार की नाही निर्णय प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 15:19 IST

माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ

आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात कार्तिकी यात्रेला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. कार्तिक वैद्य अष्टमीला गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्यास सुरुवात होणार असून मुख्य पहाटपूजा ३० नोव्हेंबरला तर माऊलींचा संजीवन सोहळा २ डिसेंबरला पार पडणार आहे. तत्पूर्वी आळंदीतील कार्तिकीवारी लाखों वारकऱ्यांच्या उपस्थित साजरी होणार की नाही? याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत सूचना जारी करण्यात आली नसल्याने तमाम वारकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागलेले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे माऊलींचा संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकीवारी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली आहे. तर आषाढीवारीही शासनाच्या नियमांना अधीन राहून मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत वाहनाद्वारे पूर्ण केली आहे. मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. तर अनेकांचे दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर पंढरीत भरणाऱ्या कार्तिकी यात्रेला शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदाची कार्तिकी यात्रा परंपरेनुसार दिमाखात साजरी होईल अशी आशा वारकऱ्यांमध्ये लागून आहे. 

         दरम्यान यंदाचा कार्तिकी वारी सोहळा शासनाच्या पूर्वपरवानगीने लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न व्हावा; असा प्रस्ताव जिल्हाधिकरी डॉ. विकास देशमुख यांच्याकडे दिवाळीपूर्वी सादर करण्यात आला आहे. अद्याप कार्तिकीवारी आयोजनाबाबत प्रशासनाकडून निर्णय जाहीर झाला नसला तरीसुद्धा यंदा परवानगी मिळेल अशी आशा वारकरी संप्रदायात दिसून येत आहे.

कार्तिकीवारीत सुमारे सहा ते  सात लाखांहून अधिक भाविक दाखल होऊ शकतात

 माऊलींचा संजीवन समाधी सोहळा अर्थात  कार्तिकी उत्सव सात ते आठ दिवस चालणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक - भक्तांची मांदियाळी हा आनंददायी सुख सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी अलंकापुरीत हजेरी लावते. सलग दोन वर्षे आषाढी तसेच कार्तिकीवारी प्रत्यक्ष हजेरी लावून अनुभवता न आल्याने यंदाच्या कार्तिकीवारीत सुमारे सहा ते  सात लाखांहून अधिक भाविक दाखल होऊ शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे.

शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा 

आळंदीची कार्तिकीवारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र अद्यापही वारीच्या परवानगी बाबत निर्णय प्रलंबित आहे. कार्तिकी वारीची व्याप्ती मोठी असल्याने स्थानिक प्रशासन व देवस्थानला यात्रेची चोख तयारी करण्यासाठी किमान एक महिना अवधी लागत असतो. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. तद्नंतर आळंदीत येणाऱ्या दिंड्यांना देवस्थानकडून सूचना देणे सोयीचे होईल.  

टॅग्स :AlandiआळंदीPuneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरTempleमंदिर