शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

पवारांच्या गावचे अजितदादांकडे; कालवा अस्तरीकरण रोखण्यासाठी गाठले थेट ‘देवगिरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 17:18 IST

भेटीनंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम थांबवले असल्याचे शेकतकऱ्यांनी सांगितले

काटेवाडी : निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम सुरु झाल्याने काटेवाडीचे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.सुरु झालेले काम पहिल्याच दिवशी शेतकºयांनी बंद पाडले.आता हे काम कायम बंद करण्यासाठी  शेतकऱ्यांनी थेट  मुंबईतील अजित पवारांचे देवगिरी निवास्सथान गाठले.सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या बाबत चर्चा केली. 

मागील दोन दिवसांपूर्वी निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम सुरू असल्याचे माहिती मिळताच काटेवाडीतील शेतकऱ्यांनी मोठा विरोध करून काम बंद पाडले. निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण होऊ द्यायचे नाही वेळप्रसंगी मोठा लढा देण्याचीही तयारी केली आहे. अस्तरीकरणामुळे पाझर बंद होऊन कुंपणलिका विहिरीच्या पाणी पातळीवर परिणाम होऊन मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अस्तरीकरण रोखण्यासाठी काटेवाडीतील शेतकरी एकवटला आहे त्यांनी थेट देवगिरी बंगला गाठला. उपमुख्यमंत्री पवार यांची सोमवार ( दि१७ ) रोजी सकाळी सात वाजता काटेवाडीतील शेतकऱ्यांनी भेट घेऊन याबाबत चर्चा केली.

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांनी सर्व परिस्थिती सांगितली. त्यावर पवार यांनी सुरुवातीला समजूत घालण्याचा प्रयत्न केला. बाबांनो हे काम पाठीमागेच भाजप सरकारच्या काळात सुरू झाले आहे. आपल्या काळात हे काम सुरु न झाल्याचे स्पष्ट केले.  मात्र अस्तरीकरणामुळे खरोखरच पाझर बंद होणार आहे, पाणी पातळी घटणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिथे विरोध आहे तेथील काम थांबविण्याची सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेदरम्यान केल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांना भेटलेल्या काटेवाडीतील शेतकºयांनी ‘लोकमत ’शी बोलताना सांगितली. या चर्चेदरम्यान पाटबंधारे खात्याचे  वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी अर्धा तासाहून अधिक वेळ गाववाल्यांशी  चर्चा करून माहिती जाणून घेतली.त्यानंतर सर्वांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेत या अस्तरीकरणाची माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीPoliticsराजकारण