शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

रावणगावजवळ खडकवासला कॅनॉल फुटला, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:10 AM

रावणगाव येथे खडकवासला कॅनॉलला घळ पडून भिंत पडल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने कुठलीही ...

रावणगाव येथे खडकवासला कॅनॉलला घळ पडून भिंत पडल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आसपासच्या परिसरातील आर्थिक नुकसान झाले. ओढ्याच्या नजीक असलेल्या विहिरी पाण्याच्या प्रवाहामुळे मातीने बुजून गेल्या. शेती पंप जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्याखाली गेले, तर काही शेतकऱ्यांचे पाईप वाहून गेले. शेततळ्यांचे बांध फुटले तसेच ताली फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

ही घटना खडकवासला साखळी क्रमांक १३५/२०० येथे आज बुधवारी (दि. २६) सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी घडली. कालवा फुटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने रावणगाव परिसरात एकच घबराट पसरली. शेतीपंप पाण्याखाली जाऊ नयेत म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. तर दुसरीकडे मात्र फुटलेला कॅनॉल आणि पाण्याचा वेग पाहण्यासाठी बघ्यांची मात्र एकच गर्दी उसळली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून रावणगाव येथील पाटबंधारे शाखेचे अभियंता विनय पागे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाहणी करून वरिष्ठांना कळविले. आणि या कॅनॉलचे पाणी भिगवण ब्रँचकडे आणि तलावात वळविले. आणि त्यानंतर पाटबंधारे खात्याच्या यांत्रिक विभागाच्या मशिनरी आणि टिपर बोलवून दुपारी एक वाजता कॅनॉल दुरुस्तीचे काम चालू केले.

पाटबंधारे खात्याच्या चुकीमुळे घडली घटना.

हा कालव्याला कित्येक वर्षांपासून त्या ठिकाणी गळती होती. परंतु पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे आरोप येथील शेतकरी वर्गाकडून केला जातो आहे. कालव्याला पाणी आल्यावर गळतीचे पाणी येथील वाड्या-वस्त्यांमध्ये पाझरून रोज लाखो लिटर पाणी वाया जाते. जर रात्री अपरात्री कॅनॉल फुटला तर मोठी मोठी दुर्घटना घडू शकते.

शेततळ्याचा भरावा वाहून गेल्याने नुकसान – सखाराम गाढवे, शेतकरी रावणगाव

कॅनॉल फुटल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते आहे.

कालव्याला थोडासा घळ पडून तो वाढला. ओढ्याच्या जवळच ही घटना झालेली आहे. यापूर्वी येथे गळती वगैरे काही नव्हती त्यामुळे दुर्लक्ष केलेले नाही. पाण्याचा प्रवाह शिर्सुफळ तळ्यात आणि भिगवण बीबीसीकडे वळवून कालवा दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करुन पुढील कार्यवाही करू.. विनय पागे

शाखा अभियंता

खडकवासला पाटबंधारे विभाग रावणगाव शाखा