शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

राजगुरुनगर बसस्थानक आवारात खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:14 IST

राजगुरुनगर आगार हे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे आगार आहे. या आगारातुन रोज शेकडो बसेसची रोज ये- जा असते. ...

राजगुरुनगर आगार हे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे आगार आहे. या आगारातुन रोज शेकडो बसेसची रोज ये- जा असते. हजारो प्रवाशांची या स्थानकात ये जा सुरू असते. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, कामानिमित्त राजगुरूनगर शहरात येणारे ज्येष्ठ नागरिक यांची विनाकारण या खड्ड्यांमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एसटी बसेचची सतत वर्दळ असल्यामुळे एसटीचे चाके या खड्ड्यांमध्ये आदळून नागरिक प्रवाशांच्या अंगावर खड्ड्यांतील पाणी उडत आहे.बसस्थानक आवारात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही पायाभूत सुविधा पसल्याने बसस्थानकातील डांबरीकरण उखडून खड्डेच खड्डे पडले आहेत.अतिशय टुमदार अशा या स्थानकात नेहमीच ऐरणीवर येणारा प्रश्न म्हणजे खड्डे. यंदाही आवारात निर्माण झालेल्या खड्ड्यांनी पावसाळ्यात अक्राळ-विक्राळ रूप धारण केले. गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे या खड्ड्यांमुळे मोठे डबके निर्माण झाले आहे. या डबक्यांतून बसेस पुढे नेण्यासाठी बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर प्रवाशांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे एसटी चालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे एसटी बसेस या खड्ड्यांत आदळत आहे. तसेच आवारात येणाऱ्या दुचाकीस्वरांना या खड्ड्यांचा अंदाज येत दुचाकीस्वार घसरून पडत आहे. स्थानक आवारातील खड्डे बुजवावेत पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.