शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कोंढापुरी तलाव कोरडा

By admin | Published: May 31, 2016 2:06 AM

कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी संपुष्टात आले आहे. या तलावावर अवलंबून असणारी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी संपुष्टात आले आहे. या तलावावर अवलंबून असणारी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.खेड तालुक्यातील थिगळस्थळ येथे चासकमानच्या डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने चालू महिन्याच्या सुरुवातीला सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनाचे लाखो लिटर पाणी ऐन दुष्काळी परिस्थितीत वाया गेल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणीही पाचुंदकर यांनी केली आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकरी होरपळत असताना असे बेजबाबदार कृत्य करणाऱ्यांना चांगला धडा शिकविणे गरजेचे असल्याचेही पाचुंदकर यांनी म्हटले आहे. रांजणगाव गणपतीसह परिसरातील ७ ते ८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोंढापुरी तलावावर अवलंबून आहे. या तळ्यातील पाणीसाठा शेवटच्या घटका मोजत असल्याने चासकमानचे पाणी तलावात सोडण्याची मागणी यापूर्वीच केलेली होती. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अत्यल्प दाब आणि चासकमानच्या अधिकाऱ्यांसह शासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज रांजणगावसह परिसरातील ६ ते ७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा खोडसाळ प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई प्रशासनाने करावी, अशी मागणी पाचुंदकर यांनी केली होती. परंतु, प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने आज रांजणगावकरांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रांजणगावची स्थायी व अस्थायी मिळून मोठी लोकस्ांख्या असून पाणीप्रश्न बिकट बनला आहे. , दिवसाआड नागरिकांना पाणी देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जात आहे.त्यामुळे परिसरातील गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.(वार्ताहर)