शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंबई-पुणे गॅस वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात : गॅस वाहतुक खर्चात होणार बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 12:07 IST

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देदररोज सव्वाशे अवजड टँकरची वाहतूक होणार कमी पुण्याला दररोज २ हजार १०० टन गॅसचा पुरवठासुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने टँकरची वाहतुक अधिक जिकीरीची हिंदुस्थान आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना दररोज प्रत्येकी ८०० आणि आयओसीला ५०० टन गॅसची गरजतीन महिन्यांत प्रत्यक्षात गॅस वाहिनीद्वारे द्रव स्वरुपातील गॅस मिळण्यास सुरुवात होणार

पुणे : शहराला स्वयंपाकासाठी आणि औद्योगिक कारणासाठी वितरीत होणाऱ्या लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसची (एलपीजी) वाहतुक आणखी जलद आणि स्वस्त होणार आहे. मुंबई-पुणे या गॅस वाहिनीचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर वाहिनीची चाचणी झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रत्यक्षात गॅस वाहिनीद्वारे द्रव स्वरुपातील गॅस मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती इंडियन ऑईल  कॉर्पोरेशनच्या (आयओसी) अधिकाऱ्यांनी दिली. आयओसीच्या चाकण येथील प्रकल्पाला नुकतेच २५ वर्षे पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रकल्प पाहणी कार्यक्रमांतर्गत ही माहिती देण्यात आली. इंडियन ऑईलच्या उप महाप्रबंधक अंजली भावे, पश्चिम विभागाचे मावळते उपमहाप्रबंधक सुरेश अय्यर, चाकण येथील प्रकल्पाचे उपमहासंचालक राजीव शर्मा, मुख्य व्यवस्थापक एच. जी. भरवाणी, वरीष्ठ व्यवस्थापक चेतन पटवारी या वेळी उपस्थित होते. आयओसीच्या चाकण येथील प्रकल्पातून २७ जिल्ह्यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. या प्रकल्पाची क्षमता दररोज ३२ हजार सिलिंडर भरण्याची आहे. चाकण प्रकल्पाचे उप महाव्यवस्थापक राजीव शर्मा म्हणाले, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना उरण येथून गॅस पुरवठा होतो. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यांत वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर वाहिनीची चाचणी झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरवठा देखील सुरु होईल. पुण्याला दररोज २ हजार १०० टन गॅसचा पुरवठा होतो. त्यासाठी सुमारे सव्वाशे टँकरची आवश्यकता असते. सुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने टँकरची वाहतुक अधिक जिकीरीची असते. ही वाहिनी पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहतूक बंद होईल. हिंदुस्थान आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना दररोज प्रत्येकी ८०० आणि आयओसीला ५०० टन गॅसची गरज आहे. वाहिनीद्वारे तळेगाव येथील हिंदुस्थिान पेट्रोलियम, चाकण येथील आयओसी आणि शिक्रापूरच्या भारत पेट्रोलियमला गॅसने वाहतुक होईल. वाहतुकीच्या खर्चात बचत होईल. मुंबई-पुणे या मार्गावर होणारी जड वाहनांची वाहतुक कमी होईल. या शिवाय कर्नाटकला मुंबई ऐवजी पुण्यातुन गॅस वाहतुक होईल. त्यामुळे दीडशे किलोमीटरचे अंतर वाचेल. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईKarnatakकर्नाटक