शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

खर्चिक असूनही इंग्रजीकडे ओढा

By admin | Published: May 12, 2017 5:14 AM

मुलांच्या शाळा प्रवेशासाठी, सध्या पालकांची मोठ्याप्रमाणात धावपळ सुरु आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही बहुतांश पालकांचा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मुलांच्या शाळा प्रवेशासाठी, सध्या पालकांची मोठ्याप्रमाणात धावपळ सुरु आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही बहुतांश पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्याचे दिसुन येते. आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे, या मानसिकतेतुन पालकांचा मोठ्याप्रमाणात कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. परंतु, इंग्रजी भाषा ही काळाची गरज असली तरीही, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतुन मिळणारे शिक्षण हे जास्त गरजेचे आहे असे शहरातील काही पालक संघटना, शिक्षक संघटना व प्राचार्य यांचे मत आहे.एखादी गोष्ट समजुन घेण्यासाठी व ती चिरकाल लक्षात राहण्यासाठी मातृभाषेतुन ती समजुन घेणे जास्त महत्त्वाचे असते. आपल्याकडे इंग्रजीचे अनावश्यक फॅड वाढत चालले आहे. त्यामुळे विद्यार्थी विषय समजुन न घेता केवळ घोकंपट्टीच करतात . सध्या मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे धाव घेऊ लागले आहेत. सीबीएसइ व आयसीएसइ यांची संलग्नता मिळविण्यासाठी खासगी शाळा प्रयत्नशील आहेत. परंतु, घरी विद्यार्थ्याच्या कानावर न पडलेल्या भाषेत त्यांना एकदम प्राथमिक शिक्षण दिले तर त्यांच्या शिकण्याच्या पध्दतीवर विपरीत परीणाम होतो. सुरूवातीची सात-आठ वर्षे शिक्षण मातृभाषेतून मिळाले तर दोन्ही भाषा मुले अधिक चांगल्या प्रकारे अवगत करु शकतात. असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.