शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

विसर्जनासाठी पाणी सोडणार

By admin | Published: September 25, 2015 1:43 AM

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून, गणेशभक्तांना खूश करण्यासाठी टंचाई परिस्थितीतही अनंत चतुर्दशीच्या म्हणजे

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून, गणेशभक्तांना खूश करण्यासाठी टंचाई परिस्थितीतही अनंत चतुर्दशीच्या म्हणजे २७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी खडकवासला प्रकल्पातून एक दिवस पुणे शहराला पुरेल एवढे म्हणजे ०.०७ टीएमसी पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. दरम्यान,नागरिकांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन करू नये, असे आवाहन बापट यांनी केले. पुण्याच्या गणेश विसर्जनासाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी गुरुवारी बापट यांच्या अध्यक्षतेखाली येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसे गटनेते बाबू वागस्कर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ उपस्थित होते. दर वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशी धरणांमधून पाणी सोडण्यात येते. परंतु यंदा पावसाने तब्बल अडीच महिने ओढ दिली. पावसाचे प्रमुख जून आणि जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळेच पाणी सोडण्याचा निर्णय पावसावर अवलंबून असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते.विविध गणेश मंडळांकडून पाणी सोडण्याची जोरदार मागणी होत असल्याने बापट यांनी बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. शहरामध्ये गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने शंभर विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत दर वर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला प्रकल्पातून ३६ तास सुमारे ०.१५ टीएमसी पाणी सोडण्यात येत होते. परंतु आता केवळ ०.०७ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, शनिवारी मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान खडकवासला प्रकल्पातून मुळा-मुठात पाणी सोडण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले. ४नदीत सोडण्यात आलेले हे पाणी खराडी येथील मुंढवा जॅकवेल येथे अडवून प्रक्रिया करून पुन्हा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जनासाठी सोडलेले पाणी वाया जाणार नाही.४विसर्जनासाठी पाणी सोडण्यास शहरातील काही पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता.