शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

संतसाहित्याने एकात्मदृष्टीचा विकास : डॉ. अशोक कामत; पुण्यात संतसाहित्यावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:01 IST

संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन  संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. 

पुणे : अलीकडे आपले जातीय, प्रांतिक, भाषिक सांप्रदायिक अभिनिवेश वाढलेले आहेत. भाषावार प्रांतरचनेमुळे आपण अधिक संकुचित झालो आहोत. अशा वेळी संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन  संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने आयोजित कै. श्रीकृष्ण ठकार स्मृती व्याख्यानमालेत ‘संत नामदेव आणि संत तुकाराम यांचे ऐतिहासिक कार्य’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी संस्थेचे वा. ल. मंजूळ, पंडित वसंतराव गाडगीळ, गणितज्ञ डॉ. रवींद्र जोशी, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अमृता नातू, आर्थिक सल्लागार गिरीश ठकार उपस्थित होते.कामत म्हणाले, आपला इतिहास विश्वकल्याणकारी आणि सांस्कृतिक आहे. तो राजकीय लढायांचा नाही. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम या चारही संतांच्या समन्वयशील वृत्तीमुळे वारकरी परंपरा टिकली. नामदेव आणि तुकाराम यांच्याबाबत विचार करताना असं लक्षात येते की दोघांच्याही समोर काळाचे विशिष्ट आव्हान होते.  हे दोन्ही संत एकमेकांना पूरक होते. ‘नामाचा तुका’ म्हणून वारकरी पंथमान्यता लाभलेले तुकाराम महाराज यांच्या काव्यकार्याशीही नामदेवरायांचा उत्कट अनुबंध आढळतो. तो अभ्यासला तर संत तुकारामांची ऐतिहासिक कामगिरी स्पष्ट होते. तसेच स्फुट रचना हीच दोहोंची मूळ प्रवृत्ती. ती रचना कीर्तनोपयोगी असणे हे ब्रीद. नामदेवांचे अनेक अभंग परिष्कृत रूपात तुकोबांनी पुन्हा सादर केले, असे दाखविता येते.

टॅग्स :bhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणेPuneपुणेsant tukaramसंत तुकाराम