शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

दाखला हवाय.. शाळेची सायकल परत द्या

By admin | Published: June 28, 2015 12:35 AM

साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, आजी-माजी अध्यक्षांचे लाचखोरी प्रकरण या मुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ चर्चेत असतानाच; आता पालिकेची शाळा

पुणे : साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, आजी-माजी अध्यक्षांचे लाचखोरी प्रकरण या मुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ चर्चेत असतानाच; आता पालिकेची शाळा सोडून इतर खासगी शाळेत प्रवेश घेतला म्हणून, विद्यार्थिनीला देण्यात आलेली सायकल परत मागण्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या वडगावशेरी येथील आनंदॠषी शाळेत घडला आहे. विशेष म्हणजे या सायकली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वाटलेल्या असल्याने त्याचा शाळेशी काहीही संबंध नसताना , शाळेकडून या विद्यार्थिनीला दाखला देण्यासाठी सायकल परत मागण्यात आली. शिवानी संतोष देवदास असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.शिवानी ही वडगावशेरीतील राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषीजी महाराज प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत होती. या वर्षी ती चांगल्या गुणांनी सातवी पास झाल्याने तसेच या शाळेत आठवीचे वर्ग नसल्याने, तिचे वडील संतोष देवदास यांनी शिवानीचे नाव याच परिसरात असलेल्या लोणकर माध्यमिक विद्यालयात घातले. दरम्यान, शाळा सुरू होण्याच्या दिवशी म्हणजे, १५ जून रोजी शिवानीच्या वर्गशिक्षिकांचा फोन तिच्या वडिलांना आला. तुमच्या मुलीचे शैक्षणिक साहित्य द्यायचे असल्याने तिला शाळेत घेऊन या,असे सांगण्यात आले. या वेळी संतोष यांनी शिवानीचा प्रवेश दुसऱ्या शाळेत घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर शाळेकडे तिच्या दाखल्याची मागणी केली. त्यानंतर आठ दिवसांनी शाळेकडून संतोष यांना फोन करून दाखला हवा असेल, तर आधी सायकल जमा करा, असे सांगत, तिच्या वडिलांनाच फैलावर घेतले. त्यानंतर देवदास यांनी मुख्याध्यापिकांशी संपर्क साधला असता, देवदास यांचीच कानउघाडणी करण्यात आली. त्यामुळे शिवानीच्या पालकांना धक्काच बसला.कोणाची सायकल... जोर कोणाचा ?राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्ताने शरद कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ७३ गुणवंतांना या सायकली वाटण्यात आल्या होत्या. त्यात एक सायकल शिवानीलाही मिळालेली होती. त्यामुळे खासगी संस्थेकडून मिळालेली सायकल शिक्षण मंडळ कसे मागते, याबाबत शिवानीच्या पालकांनाही धक्का बसला. ही सायकल मिळून दोन वर्षे झाली असताना, ती आता दाखल्यासाठी का परत मागत आहेत. या प्रश्नाने शिवानीचे पालकही चक्रावून गेले होते. शाळांचा पट वाढविण्यासाठी उद्योग ?-शिवानीची सायकल परत मागण्यामागे शाळेचा पट वाढविण्याचा प्रकार असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे. या शाळेत मुलांची संख्या कमी असतानाही, लोक प्रतिनिधींच्या आग्रहास्तव या शैक्षणिक वर्षापासून या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र, आता त्यासाठी विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यामुळे शाळेतून सातवीचे विद्यार्थी बाहेर न जाताच आपल्याच शाळेत असावेत, यासाठी शिक्षकांची तसेच मुख्याध्यापकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे पालकांना अथवा विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या धमक्या देऊन अथवा त्यांना बळजबरीने आपल्या मुलांना याच शाळेत ठेवावे यासाठी बळजबरी केली जात आहे. या शाळेत आठवीचे वर्ग नसल्याने आम्ही दुसऱ्या शाळेत शिवानीचा प्रवेश घेतला होता. मात्र, त्यासाठी सायकल परत मागणे चुकीचे आहे. ही सायकल शिक्षण मंडळाने दिलेली नाही. आम्ही शाळेकडे तक्रार केल्यानंतर अखेर शाळा दाखला देण्यास तयार झाली असून, हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही बाब कोणाशीही घडू नये.- संतोष देवदास (शिवानीचे पालक)