शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

विद्यापीठातून पत्रे गायब?

By admin | Published: October 15, 2015 1:07 AM

विद्यापीठाच्या परिक्षेत्र विद्याशाखांच्या अधिष्ठात्याकडून देण्यात येणाऱ्या बेकायदेशीर ‘डिन्स ग्रेस’ मार्कासंदर्भात सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याकडे तक्रार दाखल केल्यावर

पुणे : विद्यापीठाच्या परिक्षेत्र विद्याशाखांच्या अधिष्ठात्याकडून देण्यात येणाऱ्या बेकायदेशीर ‘डिन्स ग्रेस’ मार्कासंदर्भात सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याकडे तक्रार दाखल केल्यावर शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे याबाबतचा सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल मागिवला होता. माहिती अधिकारात या अहवालाची प्रत मिळावी, अशी विचारणा केल्यानंतर विद्यापीठाने आपल्याला शासनाचे पत्रच मिळाले नसल्याचे उत्तर दिले आहे. त्यामुळे मंत्रालयातून आलेली पत्रे विद्यापीठातून गायब कशी होतात, असा प्रश्न सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही गुणांनी होऊ नये, यासाठी ग्रेस मार्क देण्याबाबतचा नियम आहे. हा नियम विद्यापीठ अध्यादेश १ ते ४ मध्ये विस्ताराने नमूद आहे. या अध्यादेशाप्रमाणे विद्यार्थ्याला परीक्षेत जास्तीत जास्त १० गुण अथवा त्याने मिळविलेल्या एकूण गुणांच्या १ टक्के गुण यापैकी जे कमी असतील तेवढेच ग्रेस मार्क मिळू शकतात. मात्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठात अनेक वर्षांपासून विद्याशाखेच्या अधिष्ठाते त्यांच्या इच्छेनुसार २ ते १५ मार्क वाढवतात. याला डिन्स ग्रेस या नावाने ओळखले जाते. ही पद्धत मनमानी व बेकायदेशीर असल्याने सजग नागरिक मंचाने याविरुद्ध मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यासंदर्भातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १२ आॅगस्ट २०१५ रोजी विद्यापीठाकडे सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल आठ दिवसांत पाठविण्याचे पत्र पाठविले होते. अहवाल न मिळाल्याने शासनाने १० सप्टेंबर रोजी स्मरणपत्रही पाठविले. या दोन्ही पत्रांच्या प्रती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर व प्रा. अतुल बागुल यांच्याकडे आहेत. या पत्रांच्या अनुषंगाने वेलणकर यांनी विद्यापीठाकडे डिन्स ग्रेस संदर्भातील शासनाला सादर केलेला अहवाल माहिती अधिकारात मागितला. यावर विद्यापीठाने शासनाची पत्रे कुलसचिव कार्यालयात व परीक्षा विभागाकडे प्राप्त झाल्याची नोंद नसल्याचे उत्तर पाठविले. यावरून मंत्रालयातून आलेली पत्रे विद्यापीठातून गायब झालेल्या पत्रांची व एकूण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.