शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
2
"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
3
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
4
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
5
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
6
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
7
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
8
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
9
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
10
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
11
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
12
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
13
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
14
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
15
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
16
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
17
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
18
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
19
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

पातळी खालावली

By admin | Published: July 09, 2015 2:05 AM

भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

देऊळगावराजे : येथील भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.ऐन पावसाळ्याच्या कालावधीत जून व जुलै या महिन्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेली आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत पपांना पाणी पुरत नसल्याने खर्च करून पाईप व केबल वायर वाढविण्याची वेळ आली आहे. ऐन पावसाळ्यात भीमा नदीची पाणीपातळी खोलवर गेल्यामुळे सध्याचा ऊसलागवडीचा हंगाम असतानाही शेतकरी ऊसलागवड करण्यास तयार नाही. कारण, लागवड करीत असताना शेतीचा मशागत खर्च, बेणे खर्च, मजूर खर्च हा अवाचा सवा होत आहे. दुसरीकडे, पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे ऊसलागवड करावी तरीही अडचण व न करावी तरीही अडचण, अशा दुहेरी चिंतेत शेतकरीवर्ग अडकला आहे. कारखान्यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे एफआरपीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाही; त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेले पीककर्ज भरण्याची ३० जूनची तारीख उलटून गेली. मात्र, पीककर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. एकीकडे उसाची बिले वेळेवर मिळत नाहीत. पाणीप्रश्न, विजेचा प्रश्न या सर्व बाबींमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी, कर्जमाफीची मागणी शेतकरीवर्गातून पुढे आली आहे. (वार्ताहर)पावसाने दडी मारल्याने बोअरवेलचा आधार> राजेगाव : पावसाने ओढ दिल्याने राजेगाव (ता. दौंड) परिसरात बोअरवेल (कूपनलिका) घेण्याचे काम सुरू झाले आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काळेवाडी, ज्योतिबानगर, मलठण, वाटलूज, नायगाव आणि राजेगावच्या काही भागांत जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ४समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बाजरी, मका, कडवळ ही खरिपातील पिके घेण्याचा निर्णय त्याने घेतला. योग्य वापसा आल्यानंतर त्याने पेरणीही करून घेतली. परंतु, आज परंतु आज महिना होत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने आता दुबार पेरणी करावी लागते कि काय या विवंचनेत बळीराजा पडला आहे. > आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर अंकुरलेली पिके हातची जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याने पावसाचा धावा करण्यास सुरुवात केली आहे. मेघराजाने आपली वक्रदृष्टी कायम ठेवली, तर खरीप हंगाम धोक्यात येऊन चारा आणि पाण्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. ४दौंड तालुक्यातील खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्र्डी ही गावे उजनी धरणा तील पाणलोट क्षेत्रातील भागात येत असल्याने या भागातील शेतकरी ऊस हे पीक प्रामुख्याने घेत असतो. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस लागवडही भरपूर केल्या आहेत. या भागात कमी पाऊस झाला, तरी खडकवासला धरण साखळी परिसरात भरपूर पाऊस पडून एकदा उजनी धरण भरले की या भागातील शेतकरी निवांत होतो.