शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

आयुष्य म्हणजे एका कुंडीतलं झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:11 AM

आज खूप दिवसांनी म्हटले तर वर्षानी गच्चीतील झाडे नीटनेटकी करावीत असा विचार आला. कुंडीमध्ये जास्वंद, तुलसी, कोरफड, गुलाब आदी ...

आज खूप दिवसांनी म्हटले तर वर्षानी गच्चीतील झाडे नीटनेटकी करावीत असा विचार आला. कुंडीमध्ये जास्वंद, तुलसी, कोरफड, गुलाब आदी झाडे आहेत.

त्या रोपांना नीटनेटके करताना आणि कुंडी खुरपताना जाणवलं की, जंगली रोपे खूप वाढली होती त्यामुळे जास्वंदी किंवा गुलाबाच्या रोपाला वाढण्याकरिता काही वावच नव्हता. त्या जंगली रोपांची मुळे अतिशय घट्ट होती. काही केल्या जमीन लवकर सोडतच नव्हती. इतके दिवस जे काही खतपाणी घातले त्या जास्वंदीबरोबर या जंगली रोपांनीही शोशून घेतले. तुम्ही म्हणाल हे काय सांगतीय हे तर सगळ्यांना माहीत आहे, पण माझ्या मनात आलं ही गोष्ट आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडित आहे. एक कुंडी म्हणजे आपण आणि रोप म्हणजे आपली ध्येय. आजूबाजूला येणारी जंगली झाडे म्हणजे आपले निगेटिव्ह विचार, परिस्थिती

आपल्या आयुष्यात येणारी माणसे, आपल्याला ध्येय साध्य करण्यापासून दूर लोटणारे विचार इ. गोष्टी. झाडाला जसे आपण खतपाणी घालतो तसेच आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण मेहनत घेतो, परिश्रम करतो. पण आपली मेहनत व परिश्रम ध्येय साध्य करण्यात पूर्णपणे न जाता इतर गोष्टींमध्ये पण जाते. झाडाला जसे खतपाणी पूर्णपणे मिळत नाही तसेच मेहनत व परिश्रम आपले ध्येय पूर्णपणे साध्य करण्यासाठी लागत नाही. जेव्हा जंगली झाडे काढत होते तेव्हा असे जाणवले की, त्याची मुळे घट्ट मातीत रोवली गेली आहेत; ती सहज निघत नव्हती कारण ती जंगली झाडे काढायला उशीर झाला होता. झाड पूर्णपणे वाढण्याकरिता अधूनमधून खुरपणी करून जंगली झाडे काढायची असतात. तसेच आपल्या आयुष्यात आपले ध्येय साध्य करण्याकरिता आपण निगेटिव्ह विचार, ध्येयापासून दूर लोटणारे विचार, ध्येयापासून परावृत्त करणारी माणसे काढून टाकायची असतात. तसेच आयुष्यात आपली निगेटिव्हिटी काढण्यास उशीर झाला तर ती आपल्यामध्ये घर करून बसते व आपल्याला ध्येयापासून लांब नेते.

--