शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
2
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
3
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
4
"...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान
5
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
6
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
7
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
8
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
9
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
10
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
11
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
12
SIP Pause Vs Close: एसआयपी पॉज करावी की बंद, अचानक पैशांची तंगी आल्यास काय कराल; कोणता पर्याय निवडावा?
13
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
14
बाॅम्बच्या धमक्यांमुळे विमान प्रवासाची बोंबाबोब; DGCA प्रमुख विक्रम देव दत्त यांची उचलबांगडी
15
दिवाळीत कन्फर्म तिकीट मिळणार? प्रवाशांसाठी ५७० विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी उपाय
16
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
17
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
18
घट्ट मिठी अन् प्रेमाचा वर्षाव! सूरज चव्हाणला केदार शिंदेंनी दिली खास भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल
19
ज्येष्ठ नागरिकांना लोनची गरज पडली तर करावं? 'हे' ४ पर्याय बनू शकतात 'संकटमोचक', जाणून घ्या
20
गौरी योग: ७ राशींना दिवाळीपूर्वी मोठे लाभ, गुंतवणुकीत नफा; अपार यश, शुभ-सौभाग्याचा काळ!

‘भारत जोडो’ प्रमाणेच आता महाराष्ट्रातही निघणार यात्रा, सर्व तालुक्यांमधून जिल्हा मुख्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:50 PM

महाराष्ट्राने दिलेल्या प्रस्तावाला दिल्लीने मान्यता दिली असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ही यात्रा चालेल

पुणे: ‘भारत जोडो’ प्रमाणेच आता राज्यातही काँग्रेसकडून यात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून जिल्हा मुख्यालयात ही यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राने दिलेल्या प्रस्तावाला दिल्लीने मान्यता दिली असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ही यात्रा चालेल. प्रदेश काँग्रेसने त्याची तयारी सुरू केली आहे.

लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीने देशातील लोकसभा मतदारसंघांचा राज्यनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दिल्लीत प्रत्येक राज्याची बैठक होत आहे. महाराष्ट्राची बैठक मागील आठवड्यात झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील २२ नेते बैठकीला उपस्थित होते.

एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या राज्यात ४८ पैकी एकाही जागेवर काँग्रेसचे वर्चस्व नाही. ऐन निवडणुकीच्या वेळेस चंद्रपूरमधून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर विजयी झाले. मात्र, त्यांचे निधन झाले. या स्थितीबद्दल दिल्लीतील नेत्यांनी खंत व्यक्त केली व ही स्थिती कशी बदलता येईल याची विचारणा केली.

कार्यकर्त्यांना कृती कार्यक्रम देत त्यात नेत्यांनाही सहभागी व्हायला लावले पाहिजे, असे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी बैठकीत सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारत जोडासारखी राज्यातही यात्रा सुरू करण्याची कल्पना मांडली. बैठकीला उपस्थित असलेले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांनी याला लगेचच मान्यता दिली. त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगितले.

त्याप्रमाणे प्रदेश काँग्रेसने आता या यात्रेची आखणी केली आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतून ही यात्रा जाईल, अशी रचना करण्यात आली आहे. २० सप्टेंबरपर्यंत शेतीची कामे पूर्ण होऊन शेतकरी मोकळे होतील. त्यामुळे २० सप्टेंबरनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली. यात प्रत्येक तालुक्यातून ही यात्रा स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्यासह सुरू होईल. तालुक्यातील गावांमधून फिरून ती जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी येईल. राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या ठिकाणी यात्रेचा समारोप होईल. यात्रेदरम्यान काँग्रेसची ध्येयधोरणे, देशाची सद्य:स्थिती, महागाई, बेरोजगारी, त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश यावर भर देणे अपेक्षित आहे.

टॅग्स :PuneपुणेBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसPoliticsराजकारणSocialसामाजिक