शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

साहित्य महामंडळाची तारेवरची कसरत

By admin | Published: November 10, 2015 1:38 AM

साहित्य संमेलनांना आलेले उत्सवी स्वरूप, साहित्यिकांपेक्षा राजकारणी व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यासपीठावरील गर्दी हे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते

पुणे : साहित्य संमेलनांना आलेले उत्सवी स्वरूप, साहित्यिकांपेक्षा राजकारणी व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यासपीठावरील गर्दी हे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते. संमेलन पार पाडण्यासाठी हितसंबंध जोपासण्याची वेळ आयोजकांवर येते. ८९व्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांनी सत्कार समारंभातच ‘अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही’, असा सज्जड दम दिल्याने साहित्य महामंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.साहित्य संमेलनांना उत्सवी स्वरूप आल्याचे साहित्य परिषदेनेही मान्य केले आहे. साहित्याचा उत्सव साजरा करण्यात काही हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे व्यासपीठावर राजकारणी व्यक्तींची होणारी गर्दी हासुद्धा दर वर्षी वादाचा विषय असतो. साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी व्यक्ती कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतो. राजकारण्यांच्या भाऊगर्दीमुळे व्यासपीठावरून साहित्यिक दूर सारले जातात, हे नेहमीचेच चित्र असते. पण, भविष्यात हे चित्र बदलेल, अशी आशा करायला काही हरकत नाही. पिंपरी येथे होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य श्रीपाल सबनीस निवडून आले आहेत. या निमित्त प्रथेप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिदषेने त्यांचा सत्कार केला. या सत्कार सोहळ्यात सबनीस यांनी कळीच्या मुद्द्यालाच हात घातला. संमेलनादरम्यान साहित्य संमेलनाध्यक्षांचा अवमान खपवून घेणार नाही, संमेलनाध्यक्षांचा अवमान म्हणजे महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेचा अवमान, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली आहे.या संदर्भात सबनीस यांनी काही संदर्भ दिले आहेत. ते म्हणाले, ‘‘घुमानच्या संमेलनात उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्षांना अंग चोरून उभे राहण्याची वेळ आली. ते बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांची खुर्ची इतरांनी बळकावली. संमेलनाचे अध्यक्षपद हे मानाचे आहे. अध्यक्षांचा मान राखलाच गेला पाहिजे. ही बाब कुणाच्या लक्षात आली की नाही हे माहीत नाही, पण एक जागरुक नागरिक म्हणून मी हा मुद्दा उपस्थित केला.’’सबनीस म्हणाले, ‘‘राजकारणी व्यक्तींनी व्यासपीठावर असू नये, असे मी म्हणत नाही. यशवंतरावांची परंपरा जपणाऱ्या राजकारणी व्यक्तींचे स्वागतच करू. संमेलनाध्यक्षांचा सन्मान राखणे ही महामंडळाचीच जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून परिषदेच्या घरगुती कार्यक्रमात व्यथा बोलून दाखविली.’’ (प्रतिनिधी)