शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात ५ हजार १९० कोटींचे कर्जवाटप : जिल्हाधिकारी दिवसे  

By नितीन चौधरी | Updated: December 13, 2024 20:35 IST

सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले

पुणे : जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटींचा आहे. त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. पीककर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) खरीप हंगामाचे उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी एवढे आहे. किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) अंतर्गत सप्टेंबर अखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप जिल्ह्यातील विविध बँकांनी करून ११६ टक्के लक्ष्य गाठले आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, बँक ऑफ महाराष्ट्राचे महाप्रबंधक डॉ. जावेद मोहनवी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक भूषण लगाटे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाप्रबंधक बचेंद्रा मलिक, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाप्रबंधक वृषाली सोने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील आदी उपस्थित होते.

दिवसे म्हणाले, “जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठ्यामध्ये मागील वर्षापेक्षा ७४ हजार २८५ कोटींनी वाढ करण्यात आली आहे. कृषी पतपुरवठ्यामध्ये मागील वर्षापेक्षा ८७० कोटींची वाढ करण्यात आली. तसेच सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी २० हजार कोटींची भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. पीक कर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) खरीप हंगामाचे उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी एवढे आहे. किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) अंतर्गत सप्टेंबर अखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्ज वाटप जिल्ह्यातील विविध बँकांनी करून ११६ टक्के लक्ष्य गाठले आहे. वार्षिक पीक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड) उद्दिष्टाच्या अनुषंगाने बँकांनी आजपर्यंत ५ हजार ७४५ कोटी कर्जाचे वाटप करून ९० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे.”

राज्य व केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध रोजगार योजनेचा आढावा घेत असताना बँकांनी कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करावी. बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी बँकस्तरावर आढावा घेऊन नामंजूर झालेल्या प्रकरणांचा अहवाल डिसेंबर अखेर सादर करावा, अशा सूचना दिवसे यांनी दिल्या. लघाटे म्हणाले, सरकारी योजनेंतर्गत कर्ज वाटप वेळेवर करावे. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँकांनी मेळावे घ्यावेत. मोहनवी आणि योगेश पाटील यांनी कर्ज मंजुरीबाबत माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCropपीकCrop Insuranceपीक विमाCrop Managementपीक व्यवस्थापनAgriculture Schemeकृषी योजना