शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

लोकमत वुमेन समीट २०१९ - दोन संघर्षशालिनींचा गौरव.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 11:56 IST

सध्याचे जागतिक प्रश्न बघता महिलांनी ‘लीड टू लिव्ह’ म्हणायला हरकत नसावी.

ठळक मुद्दे‘ मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सौ ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’मार्दव, सेवा, स्वत:च्या आधी दुस-याच्या सुखाचा विचार हे मातृत्वाचे गुणं निर्भयता, बुद्धिनिष्ठ, विस्तारित विचार, विज्ञानाची ओढ हे पौरूषाचे गुण

पुणे : आदिवासी पाड्यांवरील मुलांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या आणि बचतगटाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना सक्षम करणाऱ्या ठमाताई पवार यांना  ‘ मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ तर ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथा लेखिका सुमित्रा भावे यांना  ‘सौ ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.     ’लोकमत वुमन समीट’च्या आठव्या पर्वात लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. के.एच संचेती, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब मुजुमदार आणि लेक्सिकन स्कूलच्या संचालिका डॉ. मोनिशा शर्मा उपस्थितीत या दोन संघर्षशालिनींचा गौरव करण्यात आला.

    सत्काराला उत्तर देताना ठमाताई पवार म्हणाल्या,मी स्वत: शिकलेले नाही. वनवासी कल्याण आश्रमात भाकरी थापता थापता पीठात अक्षर काढायला शिकले. लग्नानंतर दोन मुले झाल्यावर लिहायला शिकले. आज आदिवासी पाड्यातील स्थिती पाहिली तर महिलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. घरातली कर्ती बाईच अशी असेल तर मुलांवर काय संस्कार होणार? तिच्या आरोग्यावरही परिणाम होणारच यासाठी गावातील लोकांच्या पाठीवर मायेचा हात ठेवला. गावात भजनी मंडळे सुरू केली. दिंड्या काढल्या आणि ही व्यसनाधीनता दूर करण्याचा प्रयत्न केला. आज जो समाज भरकटलेला आहे. तो मुख्य प्रवाहात यावा अशी इच्छा आहे, त्यादृष्टीनेच प्रयत्न सुरू असून, शिक्षणानेच ही गोष्ट साध्य होणार आहे.    सुमित्रा भावे यांचे मनोगत यावेळी वाचून दाखविण्यात आले. गेली जवळजवळ पस्तीस वर्षे मी चित्रपट बनवत असले तरी माझे चित्रपट ज्यांना व्यावसायिक किंवा करमणूकप्रधान म्हटले जातात त्या पठडीतील नसल्यामुळे त्यांना ग्लँमर नाही. पण तरीही लोकमत वृत्त्तसंस्थेनं माझं काम बघितलं आणि त्याचं कौतुक केलं. ही गोष्ट मला नुसती माझ्या वैयक्तिक आनंदाची वाटली नाही तर प्रगल्भ सामाजिक जाणिवेची ती खूण आहे अशी भावना त्या मनोगतातून त्यांनी मांडली. सध्याच्या काळात  ‘पेड जर्नँलिझम’ हा विषय खूप चर्चेत असतो. पण आपल्या महाराष्ट्रात स्वच्छ, सकस, संवेदनशील असं काम केलं तर पत्रकार तुमचा आदर करून तुमच्या कामाला समाजासमोर आणण्यास मदत करतात हे पुन्हा एकदा अनुभवून त्याचा अभिमान वाटला असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
    या समिटची संकल्पना  ‘लिव्ह टू लीड’ अशी आहे. पण सध्याचे जागतिक प्रश्न बघता महिलांनी  ‘लीड टू लिव्ह’ म्हणायला हरकत नसावी. स्त्रीने नेतृत्वात पुढाकार घ्यायला हवा असं म्हणत असताना इथे स्त्री-पुरूष यांच्यातला शारीरिक भेद अभिप्रेत नाही. कारणं तसं म्हटलं तर ते विधान एकतर्फी आणि पुरूषांवर अन्यायकारक होईल. इथं शारीरिक भेद अभिप्रेत नसून गुणवैशिष्ट्य, अभिप्रेत आहे. मार्दव, सेवा, स्वत:च्या आधी दुस-याच्या सुखाचा विचार हे मातृत्वाचे गुणं म्हणजेच स्त्रीत्व! आणि निर्भयता, बुद्धिनिष्ठ, विस्तारित विचार, विज्ञानाची ओढ हे पौरूषाचे गुण म्हणता येतील. या दोन्ही गुणांची बेरीज झाल्याखेरीज समाजातील विषमता जाऊन निर्भेळ न्यायाचे, स्वातंत्र्याचे, समतेचे आणि बंधुतेचे म्हणजे मैत्रीचे वातावरण तयार होणार नाही. ही बेरीज, समतोल होण्यासाठी गुणांचे मूल्य बदलत राहावे लागेल. काळाच्या गरजेनुसार गुणांचे मूल्य बदलेल असेही विचार त्यांनी मनोगतातून समोर आणले. 

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटLokmat Eventलोकमत इव्हेंटSumitra Bhaveसुमित्रा भावेVijay Dardaविजय दर्डाWomenमहिला