शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

थंडीअभावी साखर उतारा घटला

By admin | Published: November 15, 2015 12:50 AM

ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांच्या संपानंतर आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी जोमाने धडधडू लागली आहेत.

सोमेश्वरनगर : ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांच्या संपानंतर आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी जोमाने धडधडू लागली आहेत. जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी मिळून ६ लाख ५९ हजार ३०१ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. ६ लाख ४ हजार १५५ पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. मात्र, थंडीचे प्रमाण पुरेसे नसल्याने साखर उतारा अजून नऊ टक्क्यांवरच घुटमळत आहे. भीमा पाटस कारखाना दोन दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. राजगड कारखान्याचे धुराडे अजून बंदच आहे. या वर्षी साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याआधीच कारखान्यांपुढे अनेक विघ्ने उभी होती. ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे कारखाने सुरू होण्यासाठी १० नोव्हेंबर उजाडला. या वर्षी उसाचे जादा क्षेत्र व दुष्काळाची भीषणता या पार्श्वभूमीवर ऊस गाळप लवकर संपविणे साखर कारखान्यांपुढे एक आव्हान आहे. १५ कारखान्यांपैकी भीमा पाटस व राजगड कारखाने वगळता उर्वरित १३ कारखान्यांमध्ये गाळपाच्या व साखर उत्पादनाच्याबाबतीत सहकारी साखर कारखान्यांच्या पुढे खासगी कारखाने गेले आहेत. बारामती अ‍ॅग्रो कारखाना ९८ हजार ४९० टन उसाचे गाळप करून १ लाख १ हजार ९५० पोत्यांचे उत्पादन घेत पहिल्या स्थानावर आहे. ८८ हजार टन उसाचे गाळप करून ८६ हजार पोत्यांचे उत्पादन घेत दौंड शुगर दुसऱ्या स्थानावर आहे. ७२ हजार ९६० टन उसाचे गाळप करून ६२ हजार ७०० पोत्यांचे उत्पादन घेत विघ्नहर तिसऱ्या स्थानावर आहे. ऊस गाळपाबरोबरच साखर उताऱ्यामध्ये खाजगी कारखान्यांनी बाजी मारली आहे. त्यात बारामती अ‍ॅग्रो पहिल्या क्रमांकावर आहे. (प्रतिनिधी)