शहरं
Join us  
Trending Stories
1
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
2
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
5
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
6
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
7
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
8
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
9
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
10
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
11
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
12
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
13
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
14
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
15
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
16
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
17
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
19
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
20
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार

Maharashtra: राज्याच्या जलसाठ्यात २० टक्के घट, आता परतीच्या पावसावरच लक्ष

By नितीन चौधरी | Published: September 26, 2023 5:08 PM

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ ३५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येथे शेतीच्या सिंतनासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे....

पुणे : मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून राज्यात २९ सप्टेंबरनंतर चांगला पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, जून ते २६ सप्टेंबरपर्यंत राज्यात झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ ७१ टक्के उपयुक्त जलसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा तब्बल २० टक्क्यांनी कमी आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ ३५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येथे शेतीच्या सिंतनासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

राज्यात १ जून ते २६ सप्टेंबर या काळामध्ये ९८० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होत असतो. त्यानुसार राज्यात आतापर्यंत ८७५ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या तो ८९.३० टक्के इतका आहे. या पावसामुळे राज्यातील मोठे, मध्यम व लघ अशा २ हजार ९९४ प्रकल्पांमध्ये मिळून २८ हजार ६७३ दशलक्ष घन मीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सरासरीच्या हा साठा ७०.८३ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ८९.३३ टक्के इतका होता. राज्यात सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात २५२५.४६ दलघमी अर्थात ३५.०६ टक्के इतका आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतीसाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. परतीच्या पावसाचा या विभागाला फारसा फायदा होत नसल्याने रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुसरीकडे कोकण विभागात ९४ टक्के जलसाठा असून त्यानंतर नागपूर विभागात ८५.५५ टक्के, अमरावती विभागात ७८, पुणे विभागात ७५, नाशिक विभागात ७३ टक्के पाणीसाठा आहे.

पाचशे टँकर सुरू-

राज्यात गेल्या वर्षी याच महिन्यात एकही पाण्याचा टँकर सुरू होत नव्हता. मात्र यंदा पाऊसच कमी झाल्याने राज्यातील ४४७ गावांमध्ये पाण्याचे ४९४ टँकर सुरू झाले आहेत. यावरूनच उन्हाळ्यात दुष्काळाची स्थिती कशी असेल याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

विभाग उपयुक्त जलसाठा (दलघमी) यंदाची टक्केवारी गेल्या वर्षीचा साठा (टक्क्यांत)

नागपूर ३९४०.९५--८५.५५--८८.१४

अमरावती २९४६.३७--७८.०५--९२.५३संभाजीनगर ४३०८.१८--३५.०६--८५.२०

नाशिक ५१४७.४४--७३.२०--८५.६३पुणे १४५२६.८६--७५.०५--९२.००

कोकण ३६५४.७५--९४.११--९०.६२एकूण ३६२७९.२४--७०.८३--८९.३३

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस