शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

Maharashtra Election 2019 : राहुल कुल यांच्यावर टीका करण्याची कुणाची लायकी नाही : सुरेश शेळके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 14:14 IST

राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ घेण्यासाठी भीमा पाटस कारखान्याचा कळवळा असल्याचा आव आणत आहे....

ठळक मुद्दे विधानसभेच्या प्रचारात भीमा पाटस कारखान्याच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टीकासुरेश शेळके यांनी यवत येथे पत्रकारांशी संवाद साधत थोरात यांच्यावर ओढले चांगलेच ताशेरे

यवत :- शेतकऱ्यांच्या मालकीचा भीमा सहकारी साखर कारखाना बंद पाडून खासगी मालकीचा होऊ दिला नाही म्हणून आमदार राहुल कुल यांना अडचणीत आणणाऱ्या मंडळींना सर्वोतोपरी सहकार्य रमेश थोरात यांनी केले. त्यामुळे भीमा पाटसवर बोलायची त्यांची लायकीच नाही अशी जोरदार टीका भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक सुरेश शेळके यांनी केली आहे.         विधानसभेच्या प्रचारात भीमा पाटस कारखान्याच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीकडून जोरदार टीका केली जात असल्याने कारखान्यात मागील अनेक वर्षात संचालक म्हणून काम केलेले आणि कुल घराण्याचे निष्ठावान कार्यकर्ते सुरेश शेळके यांनी राष्ट्रवादी आणि रमेश थोरात यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. सुरेश शेळके यांनी यवत येथे पत्रकारांशी संवाद साधत थोरात यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. ज्या थोरात यांना भीमा पाटस कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी घरी बसविले, त्यांच्या भागातून निवडून जाणारा मी संचालक आहे.आमच्यात थेट लढत त्या निवडणुकीत झाली होती.आता रमेश थोरात यांना कारखान्याची निवडणूक लढविण्याची तल्लफ देखील होत नाही. शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला भीमा पाटस कसा बंद पडेल यासाठी कायम प्रयत्नशील असणारे रमेश थोरात.. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ घेण्यासाठी भीमा पाटस कारखान्याचा कळवळा आल्याचा आव आणतात. मात्र यांना यांची जागा सभासदांनी दाखविलेली असल्याने त्यांनी आता तालुक्याच्या विकास कामांवर बोलावे असे आवाहन शेळके यांनी केले.           भीमा पाटस कारखाण्यावर कर्जाचा डोंगर झाल्याचे सांगणारे रमेश थोरात यांचे आयुष्य लाचारी करण्यात गेले आहे. आमदार राहुल कुल यांनी स्वाभिमानीपणा जपत अडचणीत असला तरी भीमा पाटस कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच ठेवला आहे.त्यात त्यांचा स्वार्थ काय ? दौंड तालुक्यात कधी नव्हता मिळाला एवढा विकास निधी मागील पाच वर्षात आला आहे.अनेकांना वैयक्तिक शासकीय योजनांचा थेट लाभ राहुल कुल यांच्या माध्यमातून मिळाला.मात्र, जनतेची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी पटाईत असलेल्या लबाड प्रवृत्तीच्या मंडळींना तालुक्यातील सुज्ञ जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही सुरेश शेळके यांनी सांगितले.

.................दौंड तालुका तांबोळी समाजाच्या वतीने राहुल कुल यांना जाहीर पाठींबा        पुणे जिल्हा युवक काँग्रेस पक्षाचे मा.जिल्हा सरचिटणीस व अंजुमन इत्तेहाद  दौंड तालुका तांबोळी समाज संघटनेचे तालुका अध्यख मोहसीन तांबोळी यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला असून दौंड तालुका तांबोळी समाज यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना जाहीर पाठींबा दिला आहे.तांबोळी समाज संघटना मुस्लिम समाजातील इतर मागास वर्गात येणाऱ्या नागरिकांसाठी काम करते.कुल यांनी आमदार असताना मुस्लिम समाजासाठी अनेक विकास कामे केल्याने त्यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :daund-acदौंडElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण