शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

आपल्या मातीतील कलावंतांची महाराष्ट्राला किंमतच नाही राहिली; सुबोध भावेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 11:24 IST

मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज

पुणे : आपल्या मराठी मातीने आपल्याला छत्रपती शिवरायांसारखे कणखर नेतृत्व दिले, लोकमान्यांसारखे विचारवंत दिले, बालगंधर्वांसारखे अस्सल कलावंत दिले. ही यादी भरपूर मोठी आहे, मात्र, दुर्दैव असे की आपल्या मातीमधील या दिग्गजांची, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कार्याची, दिलेल्या बलिदानाची महाराष्ट्राला किंमत राहिलेली नाही, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केली.

साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा कलादीप पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कवी डॉ. पं. संदीप अवचट यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत सुबोध भावे बोलत होते. स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर उपस्थित होते.

भावे म्हणाले की, नाटकाच्या माध्यमातून मी कलाक्षेत्रात आलो तरीही नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमांत काम करायला मला आवडतं. मात्र, समाधान देणारी भूमिका किंवा चांगले मानधन या दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट मिळाली पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो. नाटक हा मराठी भूमीचा एक अत्यंत महत्त्वाचा श्वास आहे. आपल्याकडे नाटक केवळ पाहिले जात नाही, तर आपण नाटक साजरे करीत असतो. आपल्या या परंपरा टिकवून ठेवत असतानाच मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज आहे, असेही भावे म्हणाले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, चित्रपट आणि एकूणच कला क्षेत्रातदेखील कामगारांचे योगदान मोठे असते. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारची काम करणारी व्यक्ती ही कामगार असते, कारण त्या कामासाठी त्याला श्रम करावे लागतात.

टॅग्स :PuneपुणेSubodh Bhaveसुबोध भावे Lokmanya Tilakलोकमान्य टिळकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजartकलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण