शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

Maharashtra Rain: राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट; अमरावतीला रेड अलर्ट

By श्रीकिशन काळे | Published: September 15, 2023 8:10 PM

येत्या १८ सप्टेंबरपासून मात्र राज्यातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर राज्यात किमान काही भागातील दुष्काळाच्या सदृश्य स्थितीवर दिलासा मिळू शकणार आहे...

पुणे : राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि.१६) व रविवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, अमरावती जिल्ह्यात रेड अलर्ट सांगितला आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून मात्र राज्यातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर राज्यात किमान काही भागातील दुष्काळाच्या सदृश्य स्थितीवर दिलासा मिळू शकणार आहे.

देशातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्यप्रदेश व लगतच्या भागावर आहे. येथून एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत जात आहे. त्यामुळे उत्तर मराठवाडा, उत्तर पश्चिम विदर्भ महाराष्ट्र येथे दोन दिवस पावसाची तीव्रता वाढणार आहे. पश्चिमी वाऱ्याची तीव्रता जास्त असल्यामुळे राज्यात कोकण, गोवा, घाट माथ्यावर मुसळधारचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण गोव्यात, १६ व १७ सप्टेंबरला तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. पुढील पाच दिवस राज्यात आकाश ढगाळ राहणार आहे. तसेच पुणे व परिसरात पुढील सात दिवस ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज देण्यात आला आहे. तर १६ व १७ सप्टेंबर रोजी घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे.

रेड अलर्ट : अमरावती

ऑरेंज अलर्ट : नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, वर्धा, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, अकोला

राज्यातील पाऊस (मिमी)जळगाव : ६

महाबळेश्वर : १कोल्हापूर : ०.३

नाशिक : ०.४छत्रपती संभाजीनगर : ५

अकाेला : ०.६अमरावती : १४

बुलढाणा : ०१गोंदिया : १३

नागपूर : १५

राज्यात उद्या (दि.१६) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४,५ दिवस तीव्र पाऊस होणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.- के. एस. होसळीकर, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती